शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

By admin | Published: March 03, 2016 12:55 PM

संसदेच कामकाज चालू दिल जातं नाही यावर विचार करण्याची गरज आहे. मात्र विरोधकांमधील न्यूनगंडामुळेच विरोधक संसदेच कामकाज चालू देत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३ - काही जणांना वय वाढलं तरी बऱ्याच गोष्टी उशीरा लक्षात येतात, आणि काहीवेळा तर लक्षातच येत नाहीत असं सूचकपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी राहूल गांधींवर बोचरी टीका केली. संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं घणाघाती हल्ला चढवला. साठ वर्षे झाली तरी गरीबी गेली नाही कारण काँग्रेसनेच गरीबीची मूळं या देशात घट्ट केली आणि मनरेगासारख्या योजना आजही सुरू ठेवाव्या लागण्याची मजबुरी आली असे ते म्हणाले. आमची प्रत्येक योजना काँग्रेसचीच असल्याचा आरोप केला जातो, असं सांगताना काँग्रेस तर रेल्वेपण आम्हीच सुरू केली असा दावा करतील असंही उपहासानं सांगितलं. काँग्रेसच्या अनेक योजना आम्ही सुरू ठेवल्या आहेत, मात्र, त्या कार्यक्षम केल्या आहेत आणि त्यांच्यातील भ्रष्टाचार समूळ उपटण्याचा प्रयत्न केला आहे असा दावा मोदींनी केला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रस्तावित केलेले एक विधेयक राहूल गांधींनी पत्रकार परिषदेत फाडून टाकले होते, याची आठवण करून देत अत्यंत ज्येष्ठ असलेल्या मनमोहन सिंगांशी असं वागणं दु:खदायक होतं असं संगितलं.
 
संसदेचं कामकाज चालू दिल जातं नाही यावर विचार करण्याची गरज आहे. मात्र विरोधकांमधील न्यूनगंडामुळेच विरोधक संसदेच कामकाज चालू देत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे. संसदेचं कामकाज चालू न देणं हे देशाचं आणि विरोधकांचं नुकसान आहे. लोकांसाठी विरोधक संसदेच आवाज उठवत असतात आणि जर संसदेचं कामकाज होत नसेल तर हे लोकांचं आणि देशाचं नुकसान आहे. संसदेचं कामकाज होत नसल्याने देश चिंतित असल्याचं मोदी बोलले आहेत .
 
यावेळी बोलताना मोदींनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचा दाखला देत त्यांचीच पत्र वाचून दाखवत विरोधकांना चिमटे काढले. लोकांच्या भल्यासाठी आणलेल्या योजना रोखून तुम्हाला काय मिळत ? असा सवालही विरोधकांना विचारला. 8 मार्चला महिला दिनानिमित्त फक्त महिला खासदारांना बोल दिलं जावं, तसंच एक आठवडा फक्त पहिल्यांदा निवडून आलेल्या नव्या खासदारांना बोलू दिलं जाव असा प्रस्तावही मोदींनी ठेवला आहे. मेक इन इंडिया' या देशासाठी असलेल्या कार्यक्रमाचीच खिल्ली का उडवण्यात येत आहे? हे मला समजत नाही. तो कार्यक्रम यशस्वी होत नसेल, तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोमणादेखील मारला आहे. 
 
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 
 - भाषण करणा-या सदस्यांची स्तुती झाली तर कामचुकार सदस्यांचे काय होईल, या भितीने त्यांना बोलायला दिले जात नाही. विरोधकांकडून संसद चालू न देणे हे न्यूनगंडाचे लक्षण आहे
- जेव्हा गोंधळामुळे सदनाचे कार्य चालत नाही तेव्हा देशाचे आणि खासदारांचे सर्वात जास्त नुकसान होते - 
- सभागृहात या आधी जे जे काही घडले, संसद वारंवार ठप्प झाल्यामुळे देश चिंतेत आहे 
- संसदेत सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, संसदेची प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे. हे मी नव्हे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते 
- संसदेतील चर्चेत अडथळे आणल्यामुळे नुकसानच होते - 
- महत्वपूर्ण विधेयके पारित करण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सहकार्य करावे - 
 - जीएसटी विधेयक तुमचेच आहे, मात्र आता तुम्हीच ते रोखण्याचा प्रयत्न करत आहात 
- जागतिक महिला दिनी ( ८ मार्च) सभागृगात केवळ महिलांनाच बोलू द्यावे 
- संसदेच्या अधिवेशनात एक आठवडा केवळ नव्याने निवडून आलेल्यांना, पहिल्यांदाच खासदार बनलेल्यांना बोलण्याची संधी मिळायला हवी - 
- देशातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे 
 - 'मेक इन इंडिया' या देशासाठी असलेल्या कार्यक्रमाचीच खिल्ली का उडवण्यात येत आहे? हे मला समजत नाही. तो कार्यक्रम यशस्वी होत नसेल, तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत 
- काही लोकांचं वय तर वाढतं पण त्यांच्याकडे समजूतदारपणा येत नाही 
- विरोधकांनी गरीबिची मूळं इतकी खोलवर रूतवली आहेत की ती सहजपणे उखडून काढता येत नाहीयेत 
 - विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात गरिबी मिटवली असती तर आज गरीबांसाठी असलेल्या योजनांची गरजच पडली नसती 
 - ६० वर्षाच्या काळात काँग्रेसकडून गरीबांचे भले झाले नाही. मनरेगा ही ६० वर्षांच्या अपयशाचे स्मारक आहे
 - तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम कसं करू शकता, हेच शल्य, चिंता विरोधकांच्या मनात आहे
 - मनेरगामध्ये घोटाळा झाला या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंच्या मताशी मी सहमत, कॅगच्या २०१२च्या अहवालात तेच नमूद केलं आहे
 - काँग्रेसची सत्ता असलेल्या चार राज्यांमध्ये अन्न सुरक्षा योजना लागू का केली नाही?
 - आम्हाला कोणीही प्रश्न विचारू शकतं, मात्र काही जणांना कोणीही काहीही विचारू शकत नाही
 - पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश फाडून टाकणं ही कुठली संस्कृती
 - इतरांना उपदेश करणं सोपं असतं, पण त्यांच स्वत: अाचरण करणं सर्वात कठीण असतं
 - आरोपांसोबत कसं जगायचं हे 14 वर्षात मी शिकलो आहे
 - आपण देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना नोकरशाहीच्या भरवशावर नाही सोडू शकत
 - तुम्ही विरोधक अनुभवी लोक आहात, खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत चला आणि आपण देशासाठी काहीतरी चांगल काम करू