शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

एन्काऊंटरवर विरोधक आक्रमक

By admin | Published: November 01, 2016 2:39 AM

सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- भोपाळजवळ चकमकीत सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भाजपने अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सुरक्षा दलाचे नीतीधैर्य दडपणे ठरते, असा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.एआयएमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी हा अल्पसंख्यकांवरील घाला असल्याचे सांगत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी सत्य बाहेर आणण्यासाठी न्यायालयीन चौकशी करावी, असे काँग्रेस आणि माकपनेही म्हटले. काँग्रेस आणि माकप सिमीचे समर्थन करीत असून, या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काय घडले याबाबत विस्तृत माहिती बाहेर येत आहे. आम्ही अहवालाची प्रतीक्षा करू त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले. अतिरेक्यांनी पलायनाचा कट फार आधीच आखला असावा, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्रालय आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांकडे कारागृहात शस्त्रे नव्हती. कारागृहाबाहेर पडताच त्यांनी ती कशी मिळविली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>कोणत्या परिस्थितीत अतिरेकी पळून गेले हे सरकारला कळावे यासाठी मी न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. अति सुरक्षा असलेल्या कारागृहातून अतिरेकी कसे पळून गेले, काही तासांतच त्यांना कसे पकडण्यात आले आणि ठार मारण्यात आले, ते जनतेला कळायला हवे.- कमलनाथ, काँग्रेसचे खासदार.सिमीचे आठही जण पोलिसांच्या निर्दयतेचे बळी ठरले आहेत. त्यांच्याविरुद्धची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मात्र सरकारला त्यांचा दोष सिद्ध करता आलेला नाही. त्याच भीतीपोटी मध्य प्रदेशच्या पोलिसांनी या सर्वांची हत्या केली.- असादुद्दीन ओवेसी, एआयएमआयएमचे नेते.यापूर्वी काँग्रेसने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे समर्थन केले होते. आता हा पक्ष सिमीच्या अतिरेक्यांचे समर्थन करीत आहे. या पक्षाचे नेते सुरक्षा दलाचे नैतिक धैर्य दडपत आहेत.- जीव्हीएल नरसिंह राव, भाजपचे प्रवक्ते.या चकमकीबाबत दिलेली माहिती अतिशय संशयास्पद आहे. सरकार आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या दाव्यातील विसंगती समोर आली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.- वृंदा करात, माकपच्या नेत्या.याआधी खंडवा कारागृहातून अतिरेकी पळून गेले होते. हे पहिल्यांदाच घडले नाही. मध्य प्रदेशातच पुनरावृत्ती घडावी, हे आश्चर्यकारक आहे.- ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसचे खासदार.