शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Agneeveer Yojana: वाद सुरू असतानाच 'या' काँग्रेस नेत्यानं केलं अग्निपथ योजनेचं कौतुक, सांगितलं का आवश्यक आहे ही योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:30 PM

मोदी सरकारच्या या योजनेला देशातील अनेक भागांतून विरोध होत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस पक्षानेही सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे कौतुक केले आहे. हे एक योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, आजच्या काळात आपल्याला एका मोबाईल आर्मीची आणि एका युथ आर्मीची आवश्यकता आहे. आपल्याला तंत्रज्ञान आणि शस्त्रांवर अधिक खर्च करावा लागेल आणि जोवर आपले सैन्य मोठे होत नाही, तोवर हे होणार नाही. यासाठीच सर्वाधिक पैसा खर्च होतो.

मोदी सरकारच्या या योजनेला देशातील अनेक भागांतून विरोध होत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस पक्षानेही सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. ही सुरक्षा दलांशी तडजोड असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका मांडत, गेल्या दशकांमध्ये युद्धाच्या स्वरूपातील बदल ही एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

तिवारी म्हणाले, "जर आपण सुरक्षा दलांकडे तीन दशके मागे जाऊन बघितले, तर आपल्याला मोबाईल अभियान दलाची आवश्यकता आहे, जे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत आणि तरुण देखील आहेत. यामुळे, त्या स्थितीत ही एक अत्यंत आवश्यक सुधारणा आहे.'' याच बरोबर, आपल्या आवडो वा न आवडो, पण वन रँक वन पेन्शन योजनेमुळे वाढणारे पेन्शन बिल, सरकारच्या हिशोबात गेलेच असेल, असेही तिवारी म्हणाले.

या योजनेमुळे देशभरातील तरुणांमध्ये नाराजी दिसून येत आहे, हे मान्य करत तिवारी म्हणाले, केंद्रीय सुरक्षा दल म्हणजे काही रोजगार हमी कार्यक्रम नाही. मात्र, तरीही सरकारने वर्तमान परिस्थितीनुसार, नियोजन करायला हवे. जेणेकरून अग्निवीरांची चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलांत रोजगाराच्या संधी मिळू शकतील. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान