शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

‘अग्नी-५’ची पल्लेदार झेप

By admin | Published: January 31, 2015 11:54 PM

भारताने ५००० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेतली.

यशस्वी चाचणी : ५ हजार कि.मी.पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमताबालासोर : भारताने ५००० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेतली. अंदाजे एक टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राने ओडिशाच्या व्हिलर बेटावरून आकाशात यशस्वी झेप घेतली. हे क्षेपणास्त्र सडक अथवा रेल्वे मार्गाने कोणत्याही ठिकाणी वाहून नेले जाऊ शकते आणि कोणत्याही ठिकाणावरून डागता येते.सकाळी ८.०६ वाजता इंटेग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स-४ वरून मोबाईल लाँचरद्वारा हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती आयटीआरचे संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी दिली. आजची चाचणी अत्याधुनिक सचल प्रक्षेपकाद्वारे करण्यात आली. हे प्रक्षेपक (लाँचर) सडक मार्गाने कोणत्याही स्थळी नेले जाऊ शकते. खुल्या प्रक्षेपणाच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी वेळाच्या तयारीत डागले जाऊ शकते. विश्वसनीयता, दीर्घायुष्य, देखभालीचा कमी खर्च आणि कोणत्याही भागात नेण्याची क्षमता हे या प्रक्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य आहे. डीआरडीओचे मावळते महासंचालक अविनाश चंदर म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण आहे. कॅनिस्टरद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे भारताचे पहिलेच आयसीबीएम आहे. देशाच्या प्रतिरोधक क्षमतेसाठी ही मोठी उपलब्धी आहे.’ (वृत्तसंस्था)‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रात नवे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचे ऐकून मला मोठा आनंद झाला आहे. तुमच्या या अथक परिश्रमासाठी देश सदैव आभारी राहील. या देशाला तुमचा अभिमान आहे,’ असे मुखर्जी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.डीआरडीओचे महासंचालक आणि संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अविनाश चंदर यांना पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे.