शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 1:01 PM

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत. तर, भाजप नेत्यांच्या घरावर हल्लेही होत आहेत. आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घराची तोडफोड केली. याशिवाय सासाराम येथील भाजप नेते संजय जयस्वाल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यात विरोधअग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्याचा विरोध सुरू झाला आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे. आज सकाळपासून बिहारमधील लखीसराय, बेगुसराय, हाजीपूर, मुंगेर, खगरिया, औरंगाबाद, समस्तीपूर आणि बेतियासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टायर जाळले. चार ठिकाणी गाड्यांना आग लावण्याचेही वृत्त आहे.अनेक ट्रे रद्दउत्तर प्रदेशातील बलिया येथेही एका ट्रेनला आग लावण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हरियाणातील नारनौलमध्ये आंदोलकांनी जिल्हा उपायुक्तांच्या घरासमोर निदर्शने केली. त्याच्या घरावरही दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी आंदोलकांनी केवळ रस्तेच रोखले नाहीत तर रेल्वे ट्रॅकही अडवले. रुळांवर टायर जाळण्यात आले आणि अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. रेल्वेने सांगितले की, विरोधामुळे 34 गाड्या रद्द कराव्या लागल्या, त्यापैकी 29 प्रवासी गाड्या होत्या. तर 72 गाड्या उशिराने धावत आहेत. आजही 38 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.यूपी-बिहार ते एमपी-राजस्थान-तेलंगाणापर्यंत निदर्शनेकेंद्राच्या या नवीन अग्निपथ योजनेचा देशभरातून विरोध होताना दिसत आहेत. याची सुरुवात बिहारमध्ये झाली, आता देशभरातील 11 राज्यांमध्ये या योजनेविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. बिहार येथे सर्वाधिक हिंसक निदर्शने होत आहेत. या पाठोपाठ उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तेलंगाणा राज्यातील अनेक भागात हिंसक आंदोलन होत आहे.सरकारने वयोमर्यादा वाढवली आहेअग्निपथ योजनेला विरोध करण्याची दोन मोठी कारणे समोर येत आहेत. सर्वप्रथम, या अंतर्गत केवळ 4 वर्षे सैन्यात सेवा करण्याची संधी असेल. आणि दुसरे म्हणजे यात पेन्शनची तरतूद नाही. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने रात्री उशिरा अग्निवीरांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 23 वर्षे केली. ही सवलत यंदाही कायम राहणार आहे. म्हणजेच या वर्षी 17.5 ते 23 वर्षे वयोगटातील तरुण अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरतीसाठी अर्ज करू शकतात.अग्निपथ योजनेत या सुविधा मिळणार...अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे. यंदा 46 हजार तरुणांची भरती होणार आहे. या वर्षी वयोमर्यादा 17.5 ते 23 वर्षे असेल, तर पुढील वर्षापासून ही मर्यादा 21 वर्षांपर्यंत असेल. योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. अग्निवीरांना दरमहा 30 हजार रुपये पगार मिळणार आहे. हा पगार दरवर्षी वाढणार असून चौथ्या वर्षी पगार दरमहा 40 हजार रुपये होणार आहे. याशिवाय अग्निवीरांना 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. सेवेदरम्यान शहीद झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 44 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के तरुण सैन्यात कार्यरत राहतील. त्यांना आणखी 15 वर्षे सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या दरम्यान, त्यांना दलांचे कायदे आणि अटी लागू होतील.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारRajasthanराजस्थानHaryanaहरयाणाTelanganaतेलंगणाUttar Pradeshउत्तर प्रदेश