शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
2
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
3
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
4
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
5
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
6
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
7
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
8
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
9
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
10
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
11
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
12
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
13
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
14
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
15
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
16
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
17
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
18
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
19
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
20
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...

Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:38 PM

राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) लोकसभेत पुन्हा अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या या दाव्यावर, आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील होतात्म आलेले पहिले अग्निवीर अक्षय गवते, यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी यासंदर्भात बोलताना आपल्याला एकूण 1 कोटी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळाल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यावर काय म्हणाले राजनाथ सिंह? -राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात तत्कळ उत्तर दिले. राजनाथ सिंह म्हणाले, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मदत करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंचावरील उद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर अक्षय गवते यांना देशाची सेवा करताना होतात्म्य आले होते.

अक्षय गवते यांना यांना मृत्यूनंतर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. अग्निवीर अक्षय महाराष्ट्रातील बुलढाणा तालुक्यातील पिपळगाव सराई येथील रहिवासी होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात सियाचिनमध्ये तैनात असलेल्या वीस वर्षीय गवाते यांना हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर उपचारावेळी त्यांचे निधन झाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAgneepath Schemeअग्निपथ योजनाSoldierसैनिकDeathमृत्यूbuldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंह