शहरं
Join us  
Trending Stories
1
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
2
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
3
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
5
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
6
कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 
7
अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत
8
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
9
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
10
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
11
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
12
Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत
13
“तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, फडवणीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये”: मनोज जरांगे
14
१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं
15
Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
16
स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
17
लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
18
"सॉरी, आय लव्ह माय इंडिया"; चोराने SUV चोरली, ३ नोट्स चिटकवून कार रस्त्यातच सोडली अन्...
19
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
20
बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त

Farm Laws : कृषी कायद्यांना शरद पवारांचं समर्थन? नरेंद्र सिंह तोमर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 5:19 PM

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते तथा NCP अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. तोमर म्हणाले, "शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर बोलताना म्हटले आहे, की सर्वच कायदे बदलण्याची आवश्यकता नाही. ज्या मुद्द्यांवर आक्षेप असेल, त्यावर विचार करून ते बदलायला हवेत." कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यारून, शरद पवार कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करत आहेत, असे दिसते. (Agri Minister Narendra Singh Tomar welcomes the stand of NCP chief Sharad Pawar on the farm laws) 

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी." शरद पवार यांच्या या वक्तव्यावर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हणटले आहे, की आपण शरद पवारांच्या या भूमिकेचे स्वागत करतो आणि सरकारही कुठल्याही मुद्यावर चर्चेतून मार्ग निघायला हवा, यावर सहमत आहे, असे म्हटले आहे.

शरद पवारही UPA सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि सध्याच्या मोदी सरकारने जे कायदे आणले आहेत, अगदी तसेच कायदे आणण्याची त्यावेळच्या यूपीए सरकारचीही इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसकडूनही अगदी याच पद्धतीचे कायदे तयार करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. पण, गेल्या वर्षी मोदी सरकारने हे नवे कृषी कायदे आणल्यानंतर, मात्र विरोधकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे.

सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे - शरद पवारपंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी तेथे गोंधळ घातल्याचे ऐकले. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmer strikeशेतकरी संप