शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:01 PM

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता.

तिची स्वप्नं मोठी होती, तिची जिद्द मोठी होती... तिला असं काही करायचं होतं ज्यामुळे तिलाच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल... तिने अनेक संकटांना धैर्याने तोंड दिलं आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर अगदी लहान वयातच तिने यश मिळवत मोठी झेप घेतली, पण कदाचित नियतीला हे मान्य नाही. वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे जग सोडलं. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. ही तरुणी म्हणजे पुरस्कार विजेती कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी.

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. रविवारी सकाळी तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात आलेल्या पुरात अश्विनी आणि तिचे वडील एन. मोतीलाल हे वाहून गेले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत कारमधून हैदराबादला जात होते.

अश्विनीचा मोठा चुलत भाऊ एन. हरीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात प्रेमळ सदस्य गमावली आहे. ती महत्वाकांक्षी आणि हुशार होती. तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा होती. तिला तिचं करियर करायचं होतं. संपूर्ण घराला तिचा अभिमान वाटत होता. 

जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये पीएचडी केलेली अश्विनी, ICAR च्या क्रॉप रेझिस्टन्स सिस्टम्स रिसर्च स्कूलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होती. एप्रिलमध्ये रायपूर येथे झालेल्या कृषी परिषदेत तिला यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला. कुटुंबीयांनी सांगितलं की, अश्विनी गेल्या आठवड्यातच तिचा भाऊ अशोक कुमारच्या साखरपुड्यासाठी घरी आली होती. तिला रविवारी रायपूरला परतायचं होतं आणि सोमवारी ड्युटीवर जायचं होतं. 

रविवारी पहाटे तिचे वडील मोतीलाल यांनी मुसळधार पावसात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथील पुलावर जात असताना त्यांची कार वाहून गेली. तो पूल आधीच पाण्याखाली गेला होता, त्यांची कार जोरदार प्रवाहात वाहून गेली आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :foodअन्नRainपाऊस