शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:54 IST

Corona virus: कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी उत्तरं दिलं आहेत. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यात भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून येत्या काळात चिंता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्या काही थांबण्याचं नाव घेत नसून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तर अनेक राज्यांमध्ये याआधीच निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात उलथापालथ घालणारा कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया (DR. Randeep Guleria) यांनी उत्तरं दिलं आहेत. 

मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

"कोविडचा विषाणू इतका पसरला आहे की तो बराच काळ राहील. पण एकवेळ अशी येईल की लोकांची इम्युनिटी पावर वाढेल आणि रुग्णसंख्या कमी होईल. त्यावेळी सध्या इतके रुग्ण आढळणार नाहीत. लसीकरण देखील एक सर्वसामान्य गोष्ट होऊ शकते. कदाचित कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते. ज्यापद्धतीनं आपण एका तापाच्या साथीबाबत सहजपणे चर्चा करतो. त्याच पद्धतीनं कोरोना देखील सामान्य बाब होईल", असं महत्वपूर्ण निरीक्षण डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवलं. ते 'इंडिया टीव्ही'नं आयोजित केलेल्या 'डिजिटल आरोग्य संमेलनात' बोलत होते.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

लस हा कोविडवरचा उपाय नाही"लस हा कोविड-१९ विषाणूवरील अंतिम उपाय नाही. ते एक फक्त हत्यार आहे की ज्यामाध्यमातून आपण आपली कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो. पण लसीपेक्षा सर्वात मोठं हत्यार आपल्या हातात आहे ते म्हणजे कोविड संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. लस घेण्यासोबतच नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही जागरुग होऊन लस घेत आहात तर तिच जागरुकता नियमांच्याबाबतीतही दाखवायला हवी. येत्या काळात असंही होऊ शकतं की कोरोना रुप बदलेल आणि तुम्ही घेतलेले लस देखील उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आखून देण्यात आलेले नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार आहे", असं स्पष्ट मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. 

लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही"कोरोना विरोधी लस तुम्हाला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवत नाही. तर कोरोना झालाच तर मृत्यू होण्याचा धोका लस घेतल्यामुळे कमी होतो. लसीकरणामुळे आगामी काळात आपल्याला लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्याचीही गरज पडणार नाही. आपल्याला संक्रमणावर नियंत्रण मिळवता येईल. त्यात फक्त मायक्रो कन्टेंटमेंट झोन तयार करुन परिस्थिती हाताळता येईल. यात रेड, यलो आणि ग्रीन असे तीन झोन तयार करुन काम करता येईल", असंही गुलेरिया म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस