शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर ओवेसी, दिग्विजय सिंहांचा निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:48 IST

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही. (AIMIM Asaduddin owaisi tweet on mohan bhagwat's statement cowardice violence and killing are part of godse's hindutva thinking)

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी,  अशी शिकवण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? असा सवाल केला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.''

भाजपवरही निशाणा - ओवेसींनी म्हटले, अखलाकला मारणाऱ्यांच्या मृतदेहावर तिंरंगा लावला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. येथे भाजपचा प्रवक्ता विचारतो, की आम्ही हत्याही करू शकत नाही? ते म्हणाले हा भ्याडपणा, हिंसा आणि खून करणे गोडसेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे अभिन्न अंग आहे. मुस्लिमांचे लिंचिंगदेखील याच विचारांचा परिणाम आहे.

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''मोहन भागवत हा विचार आपले शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही देणार का? हीच शिकवण आपण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का?"

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत -एनसीपी नेते नवाब मलिक यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ''मोहन भागवतांचे वक्तव्य, की भारतात राहणाऱ्या सर्वांचा डिएनए एकच आहे. जर भागवतांचे हृदय परिवर्तन होत असेल तर आम्ही त्याचे स्वाग तरतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे संघटन जर धर्माच्या सीमा तोडू इच्छित असेल, तर ही चांगली गोष्ट आहे.''

नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे, विसंवाद नव्हे. - सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत. - आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDigvijaya Singhदिग्विजय सिंहMohan Bhagwatमोहन भागवतnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस