शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

एअर इंडियात गोंधळ घातला तर आता 15 लाख दंड !

By admin | Published: April 17, 2017 5:23 PM

गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे.  गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखाचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या महिन्यात एअरइंडियाच्या एका कर्मचा-यासोबत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. लवकरच हा नियम लागू होऊ शकतो. या नियमानुसार गोंधळ घालणा-या प्रवाशाची लगेच पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
 
याशिवाय विमानाला 1 तास उशीर झाल्यास 5 लाख आणि 2 तास उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याचा नियम एअर इंडिया आणणार आहे. पण जर कोणत्याही चुकीशिवाय म्हणजे एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही असा नियम बनववणार असल्याचं वृत्त आहे.
 
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवण्यात आली होती.