शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

घटना जशी हाताळावी तशी ...; टाटा समुहाच्या अध्यक्षांचे लघुशंका प्रकरणावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 9:07 PM

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर  प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर  प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

एन चंद्रशेखरन यांनी एका निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'आम्ही या परिस्थितीला ज्या प्रकारे हाताळायला हवे होते त्या पद्धतीने आम्ही हाताळले नाही. यापूर्वी, हवाई वाहतूक उद्योगावर देखरेख ठेवणारी सरकारी संस्था डीजीसीएने याप्रकरणी एअर इंडियाला फटकारले होते. यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे हे वक्तव्य आले आहे. 

'या प्रकरणी एअर इंडियाची प्रतिक्रिया जलद आणि तत्काळ असायला हवी होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप केला होता. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय ७० पेक्षा जास्त आहे. बिझनेस क्लासमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी बेंगळुरू येथून अटक केली.

ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये येताच प्रचंड खळबळ उडाली. "26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI102 ची घटना ही माझ्यासाठी आणि एअर इंडियामधील माझ्या सहकाऱ्यांसाठी वैयक्तिक वेदनादायक बाब आहे. एअर इंडियाचा प्रतिसाद खूप असायला हवा होता. जलद. आम्ही ही परिस्थिती जशी हवी तशी हाताळण्यात अयशस्वी झालो, असंही अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले. 

'एकेकाळी सरकारी क्षेत्रातील विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला काही महिन्यांपूर्वी टाटा समूहाने भारत सरकारकडून विकत घेतली. टाटा समूह आणि एअर इंडिया त्यांच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे वचनबद्ध आहेत. या स्वरूपाच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रक्रियेचे पुनरावलोकन करू. आरोपी प्रवाशाला 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे आणि परिस्थिती हाताळण्यात कर्मचाऱ्यांकडून चूक झाली की नाही याची चौकशी करण्यासाठी अंतर्गत पॅनेल स्थापन केले आहे, असंही एन चंद्रशेखरन म्हणाले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया