शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

हवा नव्हे विष... दिल्लीच नाही तर आग्राही... ताजमहाल शोधा कुठेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 7:20 AM

नवी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी घोषणा केली की, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सम-विषम योजना लागू केली जाईल. २० नोव्हेंबरनंतर योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता चौथ्या दिवशीही खराबच राहिली. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून वाहनांच्या सम-विषम नंबर प्लेटनुसार वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. चार वर्षांनी पुन्हा तोच उपाय येऊ घातला आहे. नवी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी घोषणा केली की, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सम-विषम योजना लागू केली जाईल. २० नोव्हेंबरनंतर योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असलेले विद्यार्थी वगळता सर्व शाळांमधील वैयक्तिक वर्ग निलंबित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

बांधकामांवर बंदीसह अनेक उपायकेंद्र सरकारच्या दिल्ली-एनसीआरसाठी श्रेणी कृती आराखड्यात (जीआरएपी) सुचवलेल्या बांधकाम कामांवर आणि प्रदूषित ट्रकला राजधानीत प्रवेशावर बंदी यासारखे उपायही राबवण्यात येत आहेत. सरकारी व खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याबाबत निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिवाळ्यात वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कृती योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दोन राज्यांमध्ये जुंपली प्रदूषणामुळे दोन राज्यांमध्ये जुंपली आहे. ‘आप’च्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी आरोप केला की, हरयाणातील भाजप सरकारने शेतातील काडीकचरा जाळण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी रविवारी आपशासित पंजाबमध्ये ३००० हून अधिक पेंढा जाळण्याच्या घटना घडल्याचा दावा केला.

सोमवारी ८ पट प्रदूषणसोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी सरकारच्या निर्धारित सुरक्षित मर्यादेपेक्षा सात ते आठ पट जास्त नोंदवली गेली. सलग सातव्या दिवशी या प्रदेशात विषारी धुके कायम होते. त्यामुळे नागरिकांना अनेक आजार होण्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाने फटकारलेप्रदूषणाचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर कायमस्वरूपी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेण्यास अनास्था व्यक्त केल्यावर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशpollutionप्रदूषण