शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:20 IST

Amit Shah Interview Loksabha Election Result: विचारधारा नसलेला राजकीय नेता नसावा आणि विचारधारा असलेला पत्रकार नसावा, परंतु त्याच्या उलट घडत आहे. पत्रकार हे विचारधारा असलेले आणि नेते ते विचारधारा नसलेले आहेत, असा दावाही शाह यांनी केला. 

पहिल्या पाच टप्प्यांतच केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा आकडा गाठला असल्याचा दावा करतानाच गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्याभरापासून विरोधकांची हवा तयार झाल्याची कबुली दिली आहे. तसेच पहिल्या सहा टप्प्यांत भाजपाला ३०० ते ३१० जागा मिळत असल्याचा दावाही शाह यांनी केला आहे. 

कोणत्याही देशासाठी जनतेचा सामुहिक आत्मविश्वास हे राष्ट्राच्या विकासाचे कारण असते. 130 कोटी लोकांचा सामुहिक संकल्प देखील असतो. आणि मोदीजींनी अमृत महोत्सवाची रचना करून या दोन्ही गोष्टींचा फायदा करून घेतला आहे. पुढील 30 वर्षात मोठी होणारी सर्व मुले हे करू शकतात असा दृढ निश्चय आणि आत्मविश्वास आहे. माझ्या मते ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे शाह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात ज्या मतदारसंघात निवडणुका झाल्या त्याचा निकाल आमच्यासाठी चांगला असेल. तसेच पहिल्या दोन टप्प्यांतील निकालही आमच्यासाठी मोठा असेल, असेही शाह म्हणाले. मला वाटतं, मीडियाचा एक मोठा वर्ग अजूनही आम्हाला स्वीकारत नाहीय. विचारधारा नसलेला राजकीय नेता नसावा आणि विचारधारा असलेला पत्रकार नसावा, परंतु त्याच्या उलट घडत आहे. पत्रकार हे विचारधारा असलेले आणि नेते ते विचारधारा नसलेले आहेत, असा दावाही शाह यांनी केला. 

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदावरून पायऊतार होताना 4 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांचे बजेट दिले होते. मोदींनी ते 11.80 लाख कोटींपर्यंत वाढवले आहे. अशा खर्चातून रोजगार निर्माण होतील. विमानतळ ७५ वरून १५० वर गेले आहेत. रस्ते बनवण्याचा वेग आम्ही वाढविला आहे. यातून रोजगार निर्मिती होत नाही का, असा सवालही शाह यांनी विचारला आहे. 

राहुल गांधींच्या पक्षातील एन्ट्रीनंतर काँग्रेसची वागणूक बदलली आहे. त्यानंतर राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असा आरोप शाह यांनी केला. 

विरोधकांची हवा वाटतेय...ताकदवर विरोधक नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक कंटाळवाणी होईल असे वाटत होते. परंतु गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुलीही शाह यांनी दिली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४