शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:04 IST

कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; जयशंकर यांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने निर्णय

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. त्यांची या पदावरील दुसरी कारकीर्द पाच वर्षांची असून ती पूर्वलक्षी प्रभावाने ३१ मेपासून सुरू झाली.

सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या विश्वासू सहकाºयांमध्ये डोवाल यांचा समावेश होतो. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या फेरनियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१४ साली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला होता. फेरनियुक्ती झालेले ते पहिलेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव व आता परराष्ट्रमंत्री बनलेले एस. जयशंकर हे प्रशासकीय कारकीर्दीच्या दृष्टीने अजित डोवाल यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. जयशंकर थेट कॅबिनेट मंत्री झाल्याने डोवाल यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा द्यावा लागला. बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांच्या नियोजनात डोवाल यांचा मोठा वाटा होता. डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने जी घुसखोरी केली त्यामुळे भारत व चीनमध्ये सुमारे ७३ दिवस तणावाचे वातावरण होते. त्याकाळात डोवाल यांनी भारताची बाजू लढवली. चीनला डोकलाममधून आपले सैन्य मागे घ्यावे लागले होते. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यात डोवाल यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले.

चतुर कारकीर्दीचे धनीअजित डोवाल हे १९६८च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी सुमारे ३३ वर्षे गुप्तचर अधिकारी म्हणून जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत, पंजाबमध्ये काम केले. सैन्याकडून देण्यात येणाºया कीर्ती चक्राने सन्मानित झालेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदावरून ते २००५ साली निवृत्त झाले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या नियोजनातही त्यांनी विशेष भूमिका बजावली होती

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवाल