शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

PM नरेंद्र मोदींसमोर 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत गाणारी ही काश्मीरी तरूणी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:50 IST

बालपणापासून गाण्याचा छंद लाभलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला.  

नवी दिल्ली - देशाच्या राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी पंतप्रधानांचं स्वागत केले. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानीत मराठीचा डंका वाजत आहे. शुक्रवारी सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यावेळी महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक आणि रसिक उत्साहाने सहभागी झाले. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काश्मीरी तरूणीने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. 

कोण आहे काश्मीरी तरूणी?

सरहद संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात काश्मीरच्या बांदिपुरा भागातील तरूणी शमीमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही या तरूणीने गायलेले लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी हे गाणे चांगलेच चर्चेत आले होते. शमीमा अख्तर पहिल्यांदाच समोर आली आहे असं नाही तर विठ्ठलभक्तीची गाणी, अभंग हेदेखील ती तिच्या सुरेल आवाजात गात असते. 

शमीमा अख्तर ही मूळची काश्मीरची, काश्मीरच्या बांदिपुरा भागात ती लहानाची मोठी झाली. तिचं बालपण हे दहशतीच्या सावटाखालीच गेले. एका दहशतवादी हल्ल्यात तिच्या आईला गोळी लागली. लहान असलेल्या शमीमाला आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची पुसटची कल्पनाही नव्हती. याच दहशतीत ती लहानाची मोठी झाली. आता हीच शमीमा धर्म, जात, पंत या पलीकडे जात आपल्या आवाजाने शांततेचा आणि एकतेचा संदेश देते. 

शमीमाला घरातूनच संगीताचा वारसा लाभला. तिचे आजोबा प्रसिद्ध कव्वाली गायक होते. त्यामुळे संगीताचे सूर सतत तिच्या कानावर यायचे. आजोबाची कव्वाली ऐकत ती मोठी झाली. बालपणापासून गाण्याचा छंद लाभलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला.   त्यानंतर लखनौ विद्यापीठातून तिने संगीतात पदवीही घेतली. कालांतराने शमीमा पुण्यात आली आणि तिथेच तिने मराठी गाणी आत्मसात करण्यास सुरुवात केली. वारीच्या काळात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात असताना शमीमानं गायलेली मराठी गाणी कानावर पडली. तिने गायलेली विठ्ठलाची गाणी, अभंग याचे सूर लोकांना आवडले. काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी. आई, वडील आणि पाच बहिणी हे तिचं कुटुंब. काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिला पुण्यात आणले. तिच्या मधुर आवाजातून सर्वप्रथम सूर गुंजले ते ‘पसायदाना’चे! आता याच तरूणीने मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNarendra Modiनरेंद्र मोदीSarhadसरहद संस्था