शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:21 IST

भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

लखनौ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे फोन टॅप करत आहेत, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. केंद्रीय संस्थांच्या बळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला. 

सपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अनुपयोगी मुख्यमंत्री असा केला. भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याचे सांगत ते म्हणाले की, आमचे फोन टॅप केले जात आहेत आणि मुख्यमंत्री स्वत: सायंकाळी काही लोकांच्या रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांना ते म्हणाले की, आपणही सावध रहा.  सपचे राष्ट्रीय सचिव राजीव राय यांच्या ठिकाणांवर आणि अन्य सप नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपला जसजशी हरण्याची भीती त्रस्त करत राहील, तसे उत्तर प्रदेशात त्यांचे नेते, मुख्यमंत्री आणि दिल्लीहून येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत जाईल.

...तर राजकारण बदलू शकते : प्रियांका गांधी

रायबरेली : देशातील जातीयवादी राजकारणावर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांच्या एकजुटीतून देशाचे राजकारण बदलू शकते. काँग्रेसच्या महिला सशक्तीकरण महाअभियानांतर्गत रायबरेलीत शक्ती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला शक्ती द्या, आम्ही तुम्हाला शक्ती देऊ. आम्ही एकत्रितपणे उभे राहू, तेव्हा कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. जातियवादाचे राजकारण बंद करून आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. लडकी हूं, लड सकती हूं, ही घोषणा देत प्रियांका गांधी यांनी महिलांना राजकारणात येऊन स्वत:ची लढाई स्वत: लढण्याचे आवाहन केले. उन्नाव आणि हाथरसचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात महिलांचा छळ झाला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ