शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:42 IST

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

ठळक मुद्देलखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे चाकेरी, जाजमऊ, चमनगंज आणि बेगमगंजसह अनेक भागात छापा टाकला.

नवी दिल्ली - देशावरील कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे, त्यातच दहशतवादी कारवायांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, देशातील एटीएस आणि पोलीस दलाने कार्यतत्परतेनं दहशतवादी कारवायांचा कट उधळून लावला. एटीएसनेउत्तर प्रदेशमधील  (Uttar Pradesh) काकोरी (Kakori) येथे 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अल कायदा या दहशवादी संघटनेचे हे हस्तक असून सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा त्यांचा डाव असल्याचे उघडकीस आलं आहे. यासंदर्भात यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.  

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. लखनौमधील दहशतवाद्यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरात सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरपासून  (Jammu-Kashmir) देशाच्या उर्वरित भागात सर्चऑपरेशन केले जात आहे. या दरम्यान दहशतवाद्यांचे कनेक्शन बांग्लादेशशी दिसून येत आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपर्यंत भारतीय सुरक्षा संस्था वेगाने या तपासात प्रगती करत आहेत.

लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे चाकेरी, जाजमऊ, चमनगंज आणि बेगमगंजसह अनेक भागात छापा टाकला. या दरम्यान, कानपूरमध्ये असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याविषयी माहिती मिळाली, त्यानंतर अतिरेक्यांच्या नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर चौकशी केली गेली. सुत्रांच्या माहितीनुसार, चमनगंजमधील पेचबाग येथून पोलीस आणि एटीएसच्या टीमच्या छाप्यात संशयिताला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. 

सीमा भागातून भारतात कारवायाचा प्रयत्न

उमर हलमंडी नावाच्या हँडलरला भारतात दहशतवादी कारवायांचे निर्देश देण्यात आले होते. उमर हलमंडी हा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागातून दहशतवादी कारवाया चालवित आहे. हलमंडी यांच्यामार्फत भारतात दहशतवाद्यांची भरती आणि कट्टरपंथीकरण करण्याचे काम केले जात होते. लखनौमध्ये काही जिहादी लोकांना ओळखून त्यांची नेमणूक करून त्यांनी अल कायदा मॉड्यूलची स्थापना केली. या नेटवर्कच्या मुख्य कार्यकर्त्यांमध्ये मिन्हाज, मसरुद्दीन आणि शकील यांची नावे समोर आल्याची माहिती, उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.   

टॅग्स :terroristदहशतवादीCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसUttar Pradeshउत्तर प्रदेश