शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नवरदेवाला 'झिंगाट' झालेला पाहून नवरीने दोन तासातच दिला तलाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 14:44 IST

निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला.

ठळक मुद्देनिकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला.सर्व मंडळींसमोर उठा-बशा काढण्याची शिक्षा ही दिली. 

रांची - विवाहसोहळा म्हटलं की त्यामध्ये सेलिब्रेशन, पार्टी या गोष्टी ही येत असतात. मात्र नशा करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला. इतकेच नाही तर जमलेल्या सर्व मंडळींसमोर उठा-बशा काढण्याची शिक्षा ही दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथील मौलाना आझाद कॉलनीमध्ये बुधवारी एका निकाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिमडेगा येथील वासीम अक्रमची वरात आली होती. कांटाटोली येथील एका बँक्वेट हॉलमध्ये निकाह होत होता. निकाहानंतर एक विधीसाठी नवरीचा भाऊ हा नवरदेवाला बोलवण्यासाठी गेला. तेव्हा नवरदेव त्याचा काही मित्रांसह गांजा पिताना दिसला. यावरून नवरीच्या भावाने वासीमला जाब विचारला. तर त्याने उलट उत्तर देण्यास सुरुवात केली. निकाहसाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाची माहिती मिळाली. यानंतर नाराज झालेल्या वधू पक्षाने मुलीला तलाक देण्यास सांगितले. 

तलाक दिल्यानंतर वर आणि वधू या दोन्ही पक्षात वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर थोड्याच वेळात हाणामारीत झाले. त्यावेळी वधू पक्षाने नशेत तर्र झालेल्या नवरदेवाची चांगलीच धुलाई करण्यात आली. तसेच वधू पक्षाने नवरदेवाला आपल्या घरी आणले. गुरुवारी आजुबाजूच्या लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून हुंडा म्हणून घेतलेले पैसै परत देण्यास सांगितले. घेतलेले सर्व पैसे परत दिले तरच घरी सोडलं जाईल ही अट नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांसमोर ठेवली. याशिवाय सर्व गावकऱ्यासमोर नवरदेवाला कान पकडून उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली. हुंडा म्हणून घेतलेले सर्व पैसे परत देण्याची मुलीच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार नवरदेवाने 1.5 लाख लगेचच परत केले. मात्र शिल्लक राहिलेले 1 लाख तो परत करू शकला नाही. त्यावेळी वधू पक्षाने त्याची कार आपल्याकडे जप्त करून ठेवली आणि सर्व पैसे परत केल्यानंतरच ही कार त्यांना दिली जाईल असे सांगितले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्न