शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पंचायत निवडणुकीआधी तीन महिलांसोबत केलं लग्न, निकालात दोन पत्नी निवडूनही आल्या!; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 5:38 PM

मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे.

अलीराजपूर-

मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे. एका व्यक्तीनं पंचायत निवडणूक मतदानाआधी एकाच मंडपात तीन महिलांसोबत विवाह केला. निकालानंतर त्यातील दोन पत्नी निवडून देखील आल्या आहेत. 

अलीराजपूरपासून जवळपास १४ किमी दूर असलेल्या नानपूर गावात राहणाऱ्या समरथ सिंह मोर्याची ही आश्चर्यकारक कहाणी आहे. याच वर्षी ३० एप्रिलला सार्वजनिक कार्यक्रमात त्यानं सकरी (२५), मेला (२८) आणि नानी बाई (३०) यांच्याशी एकाच मंडपात विवाह केला. पंचायत निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी तीनपैकी दोन पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि दोन्ही पत्नी विजयी झाल्या आहेत. 

विजयानंतर समरथ सिंह यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत गावात घरोघरी जाऊन मतदारांचे आभार देखील व्यक्त केले. तसंच ज्येष्ठांचे आशिवार्द देखील घेतले. समरथ मोर्या नानपुरचे सरपंच आहेत. त्यांचं कुटुंब जनतेच्या सुख-दु:खात नेहमी सोबत राहिल असं आश्वासन त्यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर समरथ यांना पाठिंबा मिळाला. यावेळी पंचायत निवडणुकीत जागा महिला उमेदवारासाठी रिझर्व्ह झाल्यानंतर त्यांनी सकरी बाई म्हणजेच आपल्या पत्नीला सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. तर दुसरी पत्नी मेला बाई हिला वॉर्ड क्रमांक-१४ मधून पंचायत सदस्य पदासाठी उभं केलं. 

"मी २००२-०३ सालापासून राजकारणात आहे. २०१० मध्ये मी सरपंच झालो आणि त्यानंतर उपसरपंच देखील झालो. २०१५ साली पुन्हा सरपंच बनलो. आता २०२२ मध्ये माझ्या दोन पत्नी निवडणूक जिंकल्या आहेत. तिसरी पत्नी शिक्षण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यामुळे ती निवडणुकीला उभी राहू शकली नाही", असं समरथ सिंह यांनी सांगितलं. 

एकाचवेळी तीन लग्न कशी केली?एकाच वेळी तीन महिलांशी लग्न करण्यामागे देखील एक खास कारण आहे. आदिवासी भिलाला समुदायात लिव्ह-इनमध्ये राहणं आणि संतती प्राप्तीची सूट आहे. जोवर विधीवत लग्न लावलं जात नाही तोवर लग्न झालं असं मानलं जात नाही. तोवर सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावण्यासाठी परवानगी देखील दिली जात नाही. त्यामुळेच सहा मुलं असतानाही समरथ मोर्या यांनी तीन लिव्ह-इन प्रेयसींसोबत लग्न केलं होतं. 

आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीनं लग्न करणं भारतीय कायद्यात बसतं का? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-३४२ अनुसार आदिवासी रिती-रिवाज आणि विशिष्ट सामाजिक परंपरांच्या संरक्षण दिलं जातं. त्यामुळे या अनुच्छेदानुसार समरथ याचं एकाचवेळी तीन जणींसोबत लग्न अवैध मानलं जात नाही. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश