शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सर्व व्यवहार होतील बोटांच्या ठशांनी!

By admin | Published: January 09, 2017 4:08 AM

नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम

बंगळुरु : नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यंत्रे कालबाह्य ठरून केवळ बोटांच्या ठशांनी पैशांचे सर्व व्यवहार करणे शक्य होईल, असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे.येथे सुरु असलेल्या तीन दिवसांच्या प्रवासी भारतीय परिषदेत युवकांसाठी आयोजित केलेल्या ‘स्टार्टअअप्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’ यावरील चर्चासत्रात बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा विश्वास व्यक्त केला.कांत म्हणाले की, वित्तीय तंत्रज्ञान आणि सामाजिक नवविचार या दोन्ही बाबतीत सध्या मोठ्या सृजनात्मक विध्वसांचे वातावरण आहे. यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताला खूप मोठी झेप घेणे शक्य होईल.देशातील १०० कोटी नागरिकांची बोटांचे ठसे व डोळ््याच्या बाहुल्यांच्या नकला अशी बायोमेट्रिक माहितीचा खजिना असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. याचा वापर करून अलिकडेच सरकारने ‘भीम अ‍ॅप’ व ‘आधार’वर आधारित व्यवहार करण्याची यंत्रणा सुरु केली आहे. याचा संदर्भ देत कांत म्हणाले की, सन २०२० पर्यंत भारतीयांना कोणताही पैशाचा व्यवहार केवळ अंगठ्याचा (ठसा) वापरून अवघ्या ३० सेकंदात पार पाडणे शक्य होईल, तसे झाले म्हणजे ओघानेच क्रेटिड व डेबिट कार्ड, एटीएम व पीओएस यंत्रांची गरजच राहणार नाही. (वृत्तसंस्था)अर्थव्यवस्था तिप्पट वाढेलकांत म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन खर्व डॉलरची आहे. य्पैकी दोन खर्व डॉलरची औपचारिक अर्थव्यवस्था आहे तर आणखी एक खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अनौपचारिक आहे. सध्या देशातील फक्त २ ते २.५ टक्के लोक कर भरतात. औपचारिक अर्थव्यवस्था वाढून जास्तीत जास्त लोक कर यंत्रणेच्या कक्षेत आल्याखेरीज १० खर्व डॉलरचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. त्यासाठी डिजिटल व्यवहारांखेरीज तरणोपाय नाही.