शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 16:59 IST

सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न म्हटलं की विविध किस्से हे आले. लग्नातील भन्नाट गोष्टी, हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे. जवळपास 20 दिवसांपासून घरामध्ये वीज नसल्यामुळे हैराण झालेल्या चार नववधू आपल्या माहेरी गेल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या यमुनापारच्या घूरपूर येथील भीटा वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इरादतगंज गावात ही अजब घटना घडली आहे. दोन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 17 मे रोजी 25 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता. गावकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर 22 मे रोजी तक्रार दाखल केली. पण ठरलेल्या वेळेत नवा ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नाही. गावकरी सतत ट्रान्सफॉर्मर बदलण्याची विनंती करीत होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नव्हता. 

इरादतगंज गावात वीज ठप्प झाल्यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. मात्र सर्वाधित त्रास नववधुंना होत होता. 20 दिवसांपूर्वी या गावात लग्न करून आलेल्या 2 जणींनी माहेरी फोन करून नातेवाईकांना बोलावलं तर 8 दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या दोन तरुणींनाही सहन झालं नाही आणि त्यांनी वीज नसल्याने वडिलांना बोलावलं आणि त्या माहेरी निघून गेल्या आहेत. 

लग्नानंतर काही दिवस तरुणी सासरी राहत होत्या. त्याच्या काही दिवसांनंतर नववधू काही दिवसांसाठी माहेरी जाते. मात्र वीज नसल्याने त्या त्रस्त झाल्या. उकाड्यामुळे हैराण झाल्या. नवरी सासरी आल्यानंतर अनेक विधी केले जातात. मात्र वीज नसल्यामुळे कोणतेच विधी होऊ शकले नाही. विधी होण्याच्या आधीच गावातील चार नववधू माहेरी परतल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीजmarriageलग्न