शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

हरियाणाहून येणारे पाणी विषारी असल्याचा दिल्ली सरकारचा आरोप

By admin | Published: February 28, 2016 3:48 PM

हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा होणा-या काही परिसरांत पाण्यामध्ये विष मिसळले असल्याचा आरोप दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल शर्मा यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २८ - हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा होणा-या काही परिसरांत पाण्यामध्ये विष मिसळले असल्याचा आरोप दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल शर्मा यांनी केला आहे. पाणी विषारी असल्या कारणाने पाण्यातील अमोनिया स्तर वाढला आहे. ज्यामुळे २ महत्वाचे वॉटर प्लांट बंद करण्यात आले आहेत. 
 
गेले २ महिने अमोनिया स्तर वाढला असल्याने आम्हाला अनेक वेळा वॉटर प्लांट बंद ठेवावे लागले आहेत. वझिराबाद, चंद्रावल आणि ओखलामधील प्लांट बंद करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा करणा-या मुख्य मुनक कालव्याची जाट आंदोलनादरम्यान तोडफोड करण्यात आली आहे. दिल्लीला याअगोदर कधीच अशाप्रकारे पाणी समस्येला सामोरे जावं लागलं नसल्याचं कपील शर्मा यांनी सांगितलं आहे.
 
दिल्ली सरकारने अमोनिया स्तर कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र स्तर वाढतच चालला आहे. ज्यामुळे वझिराबाद आणि चंद्रावलमधील प्लांट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती कपील शर्मा यांनी दिली आहे. अमोनिया सापडल्याचे आमच्याकडे पुरावे असल्याचंही कपील शर्मा यांनी सांगितलं आहे. यामुळे दिल्लीतील ३५ ते ४० लाख लोकांना पाणीपुरवठा होत नाही आहे. तसंच जोपर्यंत वझिराबाद आणि चंद्रावल वॉटर प्लांट सुरु होत नाहीत मध्य आणि उत्तर दिल्लीलादेखील पाणीपुरवठा करणं शक्य नसल्याची माहिती कपिल शर्मा यांनी दिली आहे.