शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Lok Sabha Election Result 2024 : जागा १२ च तरी केंद्रात किंगमेकर, नितीशकुमार यांची राहणार मोठी भूमिका, ‘जदयू’ला मिळू शकते झुकते माप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 05:57 IST

Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि ‘जदयू’ला समान १२ जागा मिळाल्या असल्या तरी केंद्रात पुढील एनडीए सरकारच्या स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

२०१९ मध्ये याच नितीशकुमार यांनी केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्रिपदाची भाजपची ऑफर नाकारली होती. पुढील वर्षी २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने जदयू राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याची ही संधी सोडणार नाही. केंद्रात एनडीए स्थापन करणार असलेल्या नवीन सरकारमध्ये पक्ष महत्त्वाची मंत्रालये मिळवू शकतो. 

प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलेले आहे की, भविष्यात आपण ‘एनडीए’सोबतच राहणार आहोत. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे तसेच राज्याचे राजकीय हित जपणे त्यांना सोपे जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील त्यांचे मित्रपक्ष बदलण्याच्या वारंवार घेतलेल्या निर्णयांमुळे नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रश्न उपस्थित केले गेले. याशिवाय त्यांच्या प्रकृतीवरूनही त्यांना राजकारणात लक्ष्य करण्यात आले होते.बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार केंद्र सरकारकडे दीर्घकाळापासून करत आहेत. मात्र, केंद्रात गेल्या एक दशकाच्या सत्तेत भाजपला ही मागणी पूर्ण करता आली नाही.  एनडीएचा शक्तिशाली मित्रपक्ष म्हणून त्यांच्या जुन्या मागणीवर ते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे. 

दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मागणार?‘जदयू’मधील सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीशकुमार हे किमान दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. नितीशकुमार यांच्या एनडीएमध्ये परतण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. राज्यात एनडीएचा मित्रपक्ष म्हणून लढलेल्या सर्व १६ जागांवर पक्षाची चांगली कामगिरी झाली आहे. सर्वात मागास जातीच्या मतदारांमध्ये नितीशकुमार यांची लोकप्रियता दिसून आली आहे. 

जदयू म्हणतो, आमच्यामुळे भाजपला फायदा जदयूचे मागास समुदायातील तीन तर भाजपचे मागास समुदायातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. एनडीएमध्ये नितीशकुमार हे अजूनही राज्यातील सर्वात प्रमुख ओबीसी चेहरा आहेत. नितीशकुमार हे एनडीएमध्ये परतल्याने एनडीएला राजकीयदृष्ट्या फायदाच झाल्याचे सिद्ध झाले आहे. जर नितीशकुमार राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसोबत राहिले असते तर बिहारमध्ये भाजपला यश मिळविता आले नसते. भाजपने हे वास्तव स्वीकारावे, असे मत ‘जदयू’च्या सूत्रांनी व्यक्त केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNitish Kumarनितीश कुमार