शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 16:56 IST

Coronavirus: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देनोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे केंद्र सरकारवर ताशेरेभारत कोरोनाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता, मात्र... सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर झाली

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसला. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्यामुळे ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला. यावरून विरोधकांनी आणि तज्ज्ञांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिले आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, असे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. (amartya sen criticises modi govt over corona situation in india)

केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले की, भारतच संपूर्ण जगाला वाचवू शकेल. मात्र, त्याच कालावधीत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि अन्य समस्याही मोठ्या प्रमाणात समोर आल्या. लोकांना त्याचा विळखा बसत असताना सरकार दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत, या शब्दांत अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

“...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक

भारत कोरोनाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता

मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. भारत कोरोना संकटाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता. मात्र, सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नाही, असे सेन म्हणाले. यासह अन्य काही मुद्द्यांवरून अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

दरम्यान, देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था