शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश; मंदीचीही शक्यता नाही - अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 11:33 AM

Nirmala Sitharaman : आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले.

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले. सरकारच्यावतीने उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, सध्या जगभरात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान हे, पहायला हवे. जगाने कोरोना आजाराचा सामना यापूर्वी कधीही केला नव्हता. महामारीतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत आहे. त्यामुळेच अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम राहिली आहे.

अमेरिकेच्या विकास दरात दुसऱ्या तिमाहीमध्येही ०.९ टक्क्यांची घसरण आली आहे. त्याला त्यांनी मंदीचे संकेत म्हटले आहेत. तेथील महागाई ४० वर्षांच्या उच्चांकावर आहे. भारतात मात्र मंदी येण्याचा प्रश्नच येत नाही. एका अहवालातही भारतात मंदीची शक्यता शून्य टक्के असल्याचे त्यांनी म्हटले.

मुलांनाही सोडत नाही

ग्राहकोपयोगी वस्तू गगनाला भिडत आहेत. तांदूळ, दही, पनीर यांसारख्या वस्तू, पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे. सरकार मुलांनाही सोडत नाही.

- मनीष तिवारी, काँग्रेस नेते

खाद्यतेल उतरले

सरकारने महागाई कमी करण्यासाठी आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. महामारी, दुसरी लाट, ओमायक्रॉन, रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने महागाई दर ७ टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळवल्याचे सीतारमण यांनी सांगितले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनInflationमहागाई