शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

'हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचं पाप काँग्रेसचं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:33 IST

हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

बिजनौर - हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडून काँग्रेसनेहिंदूंना बदनाम केले. हिंदू दहशतवादी असू शकत नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेहमी मतविभाजन करण्याचं राजकारण करत असतं. देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचं काँग्रेसने काम केलं. त्याचमुळे राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडे उभं रहावं लागलं. त्यांना ठाऊक आहे यंदा अमेठीतून त्यांचा हिशोब चुकता केला जाणार आहे. अमेठीच्या पराभवाला घाबरुन राहुल गांधी वायनाड येथे पळाले असा आरोप अमित शहा यांनी केला. 

 

हिंदू दहशतवाद्यावर बोलताना अमित शहा यांनी भाष्य केलं की, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही. हिंदू मुंगीला घास भरवतो तो लोकांना कसं मारेल ? हिंदूंना दहशतवादाशी जोडण्याचे पाप काँग्रेसने केले. राजकीय फायद्यासाठी संपूर्ण देशात गौरवशाली असणाऱ्या या हिंदू समुदायाला बदनाम काँग्रेसने केले असं शहा यांनी सांगितले. सूर्य हा तेजस्वी असतो त्याची चमक तुम्ही लपवू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्ष घाणेरडे राजकारण करतो. काही दिवसांपूर्वी पंचकुला येथील कोर्टाने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. तेव्हा काँग्रेसने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाला हिंदू दहशतवादाचा उदाहरण असल्याचं सांगितले. त्यावेळी गृहमंत्री पी.चिंदबरम, सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांनी देशाला लष्कर ए तोएबापासून धोका नसून हिंदू दहशतवादापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. हिंदूंना बदनाम केल्याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागायला हवी. काँग्रेसने हिंदूंवर दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला मात्र सत्य अखेर बाहेर पडलं असं अमित शहा यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाHinduहिंदूcongressकाँग्रेसbijnor-pcबिजनोर