शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Amit Shah : "विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:51 IST

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

झारखंडसह देशातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

"एक आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींची चिंता न करता लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. येणाऱ्या काळात आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. सत्तेत आल्यानंतर आमचे सरकार लोकसंख्येच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका आणणार" असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

"पराभवानंतर अहंकार येण्याची ही पहिलीच वेळ"

"लोकशाहीत विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं. काँग्रेस अहंकारी झाली आहे. एवढा अहंकार दोन तृतीयांश बहुमताने जिंकूनही येत नाही. या निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आणि भाजपाला २४० जागा मिळाल्या" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

"बुथ कार्यकर्तेच भाजपाच्या विजयाचं कारण"

"भाजपाच्या विजयाचं कारण मंचावर बसलेले नेते नसून बूथवर उपस्थित असलेले कार्यकर्ते आहेत. काँग्रेसवर पराभव स्वीकारायला तयार नाही, कोणत्या गोष्टीचा एवढा अहंकार आहे? या देशात तुष्टीकरण करून अन्याय करण्याचा अहंकार आहे, घराणेशाहीचा अहंकार आहे, १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा अहंकार आहे."

"मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं"

"नरेंद्र मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं आहे. हेमंत सोरेनजी, केंद्रात काँग्रेसची सत्ता, भाजपाने १० वर्षे राज्य केलं. हिशोब करून या. झारखंडच्या विकासासाठी काँग्रेसने ८४ हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदीजींनी १० वर्षात ३ लाख ८४ हजार कोटी रुपये दिले. असा झारखंड कोणी केला असेल तर तो भाजपाने केला आहे."

"काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो"

"देशात सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असेल तर ते झारखंड मुक्ती मोर्चा आहे. एका खासदाराच्या घरातून ३०० कोटी रुपये मिळतात. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो. ज्या व्यक्तीच्या घरातून ३०० कोटी रुपये सापडले, त्याला ते तिकीट देणार आहेत. हे घोटाळे करणारे सरकार आहे, आश्वासने मोडणारे सरकार आहे" असं म्हणत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाJharkhandझारखंड