शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 4:50 PM

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा (manipur violence) मुद्दा विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी केंद्र सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

खर्गेंनी पत्रात काय म्हटले?मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिले की, 'मला तुमचे पत्र मिळाले, हे वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे. 3 मे नंतर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीवर I.N.D.I.A. आघाडी सातत्याने पंतप्रधान मोदींनी बोलण्याची मागणी करत आहे. दोन्ही सभागृहात या विषयावर विस्तृत चर्चा व्हायला हवी. मणिपूरमध्ये गेल्या 84 दिवसांपासून जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ज्या प्रकारची घटना समोर येत आहे, यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलणे गरजेचे आहे. अशी सर्व राजकीय पक्षांकडून अपेक्षा आहे.'

'तुम्ही लिहिलेल्या पत्रात शब्द आणि कृतीचा अभाव आहे. तुमच्या भावना पत्रातील भावनेच्या पूर्णपणे विरोधात राहिल्या आहेत. हीच वृत्ती आम्हाला गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये दिसून येत आहे. छोट्या घटनांवरुन सदस्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात येत आहे. पंतप्रधान देशातील विरोधी पक्षांना ब्रिटीश आणि दहशतवादी गटांशी जोडतात आणि त्याच दिवशी गृहमंत्री भावनिक पत्र लिहून विरोधकांकडून सकारात्मक दृष्टिकोनाची अपेक्षा करतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील समन्वयाचा अभाव वर्षानुवर्षे दिसून येत होता, आता ही दरी सत्ताधारी पक्षांतही दिसू लागली आहे.'

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध खर्गे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले की, 'पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना दिशाहीन म्हणणे केवळ हास्यास्पदच नाही तर दुर्दैवीही आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना सभागृहात येऊन मणिपूरवर विधान करण्याची विनंती करत आहोत, परंतु असे केल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याचे दिसते. या देशातील लोकांप्रती आमची बांधिलकी आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजू.'

अमित शहाचे विरोधकांना पत्र यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन माहिती दिली होती की, त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांना पत्र लिहिले आहे. लोकसभेचे अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खर्गे या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून मणिपूर मुद्द्यावर चर्चेत अमूल्य सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, सर्व पक्षांचे सहकार्य गरजेचे आहे. हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष सहकार्य करतील अशी आशा आहे, असे शहा म्हणाले होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचार