शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Amit Shah, Article 370: "रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत"; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:32 IST

सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

Amit Shah, Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होती. अनेकांनी त्यावेळी या कलमाबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलने करून प्रश्नाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. पण ज्या लोकांनी मोठ्या मोठ्या गप्पा रंगवल्या, ते लोक केंद्र सरकारच्या ठाम भूमिकेमुळे नंतर काहीच करून शकले नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी विरोधकांवर निशाणा साधला. ३७० कलम रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील (खून की नदी बहेंगे) अशा शब्दांत लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे नंतर साधा छोटा दगड मारण्याचंही धाडस करू शकले नाहीत", असेही ते म्हणाले. दिल्लीत 'आइडिया ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया' या परिसंवादात ते बोलत होते.

"पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला अतिशय सहजपणे ३७० कलम रद्द केले. त्यावेळी अनेक जण धमक्या देऊन लोकांची माथी भडकवत होते. कलम रद्द झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणणारे लोक सरकारने केलेल्या धोरणांपुढे साधा एक छोटासा दगडही मारू शकले नाहीत", अशा शब्दांत अमित शाह यांनी थेट विरोधकांवर टीका केली.

सुरक्षा धोरण आणि सर्जिकल स्ट्राईक...

अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर बोलताना देशांतर्गत सुरक्षा धोरणावर भाष्य केले. "नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याआधी भारताकडे ठोस सुरक्षा धोरण (defence policy) नव्हते. जरी एखादे धोरण असेल तरीही त्यात परराष्ट्र धोरणाचीच छबी दिसत असायची. आधी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटना आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे आणि हल्ले घडवून आणायचे. उरी आणि पुलवामा असे हल्लेही आपल्या देशात घडले. पण त्यानंतर दहशतवाद्यांना भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आणि देशाचे सुरक्षा धोरण किती मजबूत आहे याची प्रचिती जगाला आली", असेही शाह यांनी नमूद केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर