शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुटुंबानं मानली हार तरी महिलेनं जगण्याची जिद्द सोडली नाही; ६ दिवसांत ५ वेळा हार्टअटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:30 IST

हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा.

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ३० ते ५० वयोगटातील लोक हार्ट अटॅकचे अधिक बळी ठरत आहेत. मात्र, यामागचे कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याचवेळी एक असं प्रकरण समोर आलंय जिथे एका ८१ वर्षीय महिलेला ६ दिवसात ५ वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जीव वाचला. 

दिल्ली मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेला श्वसनाचा गंभीर त्रास होत असल्याने हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. महिलेचं हृदय केवळ २५ टक्के काम करत होते. रुग्णालयात ६ दिवसांच्या उपचारावेळी महिलेला ५ वेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात इलेक्ट्रिकचा झटका देऊन महिलेचे हृदय पुन्हा सुरू करण्यात आले. महिलेचा जीव वाचला हे चमत्कारापेक्षा कमी नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पहिल्यांदा महिला रुग्णावर अँजिओग्राफी करण्यात आली आणि तात्पुरता पेसमेकर टाकण्यात आला. यादरम्यान महिलेला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी स्वयंचलित इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर (AICD) चा अवलंब केला. हे एक लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा वापर हृदयाच्या असामान्य ठोक्यांची देखरेख आणि हार्ट बीट ठीक करण्यासाठी केला जातो. या उपकरणांचा उपयोग गंभीर हृदयरोग्यांच्या उपचारासाठी केला जातो. ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. उपचार यशस्वी झाले असून महिलेचे प्राण वाचले आहेत असं डॉक्टर बलबीर सिंह यांनी म्हटलं. 

कुटुंबाने मानली होती हारवृद्ध महिलेवर कोणतेही औषध परिणाम करत नव्हते, अशा परिस्थितीत वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी अपेक्षा सोडली होती. मात्र, या प्रकरणी एक चमत्कार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ८१ वर्षीय महिलेला पुन्हा जीवनदान मिळाले. आता या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती ठीक आहे. हृदयविकाराचा झटका का येतो?तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा. कोणतेही शारीरिक काम केले नाही, शरीराची हालचाल केली नाही तरी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. वाढत्या वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत बदल करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्याने बरेच लोक बरे होतात, परंतु जे गंभीर हृदयाचे रुग्ण आहेत, त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची गरज आहे. 

 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका