शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:24 AM

मतदानाच्या आकडेवारीवरुन लोकांची दिशाभूल, आम्ही सर्व सांगणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्द्यावरुन संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही याबाबत सर्वांना एक दिवशी सविस्तर सांगू. लाेकांची कशी दिशाभूल केली जाते, याचा खुलासा करु, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

राजीव कुमार यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. केंद्र निहाय मतदानाची आकडेवारी तसेच फाॅर्म १७ची माहिती जाहीर करण्याचे निवडणूक आयाेगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात राजीव कुमार प्रथमच बाेलले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाने सत्य स्वीकारले आहे. परंतु,  संशयाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. याबाबत काय खेळ खेळला जात आहे, संशय का निर्माण केला जात आहे? लाेकांची कशी दिशाभूल केली, हे आम्ही सांगू, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मिरात लवकरच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकाची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकांत उत्तम प्रमाणात झालेले मतदान पाहून आनंद झाला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. मतदारांनी दाखविलेल्या उत्साह, विश्वासामुळे लोकशाहीची पाळेमुळे आणखी घट्ट रुजण्यास मदत झाली आहे. जनतेला लोकनियुक्त सरकारची आवश्यकता असते. जम्मू-काश्मीरच्या जनतेला ते मिळविण्यास पात्र आहेत. तेथे विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आम्ही लवकर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार म्हणाले.

३७० कलम रद्द झाल्यानंतर होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुमारे एक महिनाभर चालते. त्या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामुळे विधानसभेच्या जागांची संख्या ८३ वरून ९० पर्यंत पोहोचली आहे. ३० सप्टेंबरच्या आत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

किती जणांनी मतदान केले? मतदारसंघनिहाय आकडे प्रसिद्ध

पहिल्या पाच टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी शनिवारी निवडणूक आयोगाने जारी केली. तसेच मतदान झाल्यावर त्यात कोणताही बदल अशक्य असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका एनजीओची मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली हाेती. त्यानंतर आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मतदारसंघातील मतदारांची संख्या आणि किती मतदारांनी मतदान केले, ही माहिती प्रसिद्ध केली. आतापर्यंत आयोगाकडून केवळ मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात होती.

सर्वाधिक मतदान कुठे ?

  • धुबरी, आसाम    ९२.०८ 
  • ओंगाेल, आंध्र प्रदेश    ८७.०६ 
  • चित्तूर, आंध्र प्रदेश    ८५.७७ 
  • नरसरावपेठ, आंध्र प्रदेश    ८५.६५ 
  • बापटला, आंध्र प्रदेश    ८५.४८ 
  • सर्वात कमी मतदान कुठे?
  • श्रीनगर, जम्मू-काश्मीर    ३८.४९ 
  • नवाडा, बिहार    ४३.१७ 
  • हैदराबाद, तेलंगणा    ४८.४८ 
  • अल्मोडा, उत्तराखंड    ४८.७४ 
  • सिकंदराबाद, तेलंगणा    ४९.०४ 

(आकडे टक्क्यांमध्ये)लाेकांच्या मनात संशय कसा निर्माण हाेताे? कधी ईव्हीएम नीट काम करीत नाही, कदाचित मतदार याद्या चुकीच्या आहेत किंवा मतदानाच्या आकडेवारीत हेराफेरी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने तर उत्तर दिले आहे. मात्र, आम्हीही आमचे उत्तर देऊ आणि निश्चितच देऊ. -राजीवकुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान