शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 2:30 PM

मणिपूर हिंसाचाराचा काळा चेहरा जगासमोर, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही कारवाई करू, राज्य आणि केंद्र सरकारला तंबी दिली.

मणिपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत. हे पुरेसे नसताना याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे. सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. सारेकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर सरकारही कारवाईच्या पवित्र्यात आले आहे. मणिपूर सरकार आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. पीएम मोदींनीही ही घटना 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत केंद्र आणि राज्याकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे. 

नेमके काय घडलेले....या लाजिरवाण्या घटनेची तक्रार १८ मे रोजी करण्यात आली होती. एफआयआरनुसार पिडीतांनी सांगितले की, ४ मे रोजी दुपारी ९०० ते १००० जणांच्या जमावाने थोबलमधील गावावर हल्ला केला. ते मैतेई समाजाचे होते. घरांना आगी लावण्यात आल्या. घरातील पैसे, दागिने यासह किंमती वस्तू लुटण्यात आल्या. 

हल्ला झाल्याचे समजताच तीन महिला त्यांचे वडील आणि भावासोबत जंगलाकडे पळाले. पोलिसांच्या टीमने त्यांना वाचविले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. तेवढ्यात जमावाने पोलिसांना थांबविले आणि त्यांच्याकडून त्या महिला आणि त्यांच्या वडील-भावाला हिसकावून घेतले. पोलिस ठाणे तेथून दोन किमीवर होते. पोलिसांच्या समोरच जमावाने वडिलांची हत्या केली. यानंतर तिथेच महिलांना कपडे काढण्यास मजबूर करण्यात आले. एका महिलेचे वय २१ वर्षे, दुसरीचे ४२ आणि तिसरीचे ५२ वर्षे होते. 

त्या निर्वस्त्र महिलांना जमावाच्या पुढे चालण्यासाठी दबाव आणला गेला. यावेळी त्यांच्यासोबत छेडछाड करण्यात येत होती. २१ वर्षांच्या तरुणीवर जमावाने सामुहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ठार मारण्यात आले. हा प्रकार घडत असताना दोन महिलांना त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी तिथून बाजुला नेत जमावाच्या तावडीतून सोडविले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMolestationविनयभंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी