शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दिल्लीतील हालचालींना वेग; शरद पवार पुन्हा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 1:43 PM

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपण्याअगोदरच चंद्राबाबू नायडू यांच्याकडून विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील अंतिम टप्पा संपल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांमध्ये मध्यस्थी घेण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पुन्हा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या 24 तासांत नायडू यांनी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. तसेच संध्याकाळी चंद्राबाबू नायडू युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे निकालनंतरची विरोधकांची रणनीती ठरविण्याला नायडू बळ देताना पाहायला मिळत आहेत. 

चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अजूनपर्यंत विरोधकांची रणनीती ठरली नाही. निकालांअगोदर विरोधकांची कोणती बैठक होणार नाही. विरोधी पक्षातील सर्व नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा पवार केंद्रस्थानी आल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे. 

निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी!

चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु केलेत. 23 मे रोजी निकाल लागण्याआधी विरोधकांनी एकत्र येत निकालानंतरची रणनीती ठरवावी यासाठी चंद्राबाबू नायडू प्रयत्नशील आहेत. विरोधकांची रणनीती ठरविण्यासाठी 21 मे रोजी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ती बैठक होणार नाही अशी माहिती आहे. 

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपण्याअगोदरच चंद्राबाबू नायडू यांच्याकडून विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी नायडू यांनी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, माकपा नेते सीताराम येचुरी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर नायडू यांनी लखनऊला जात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. तसेच बसपा प्रमुख मायावती यांची भेट चंद्राबाबू नायडू यांनी घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या तर विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी दावा करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

विरोधकांकडून लोकसभेत कर्नाटक मॉडेलची पुनरावृत्ती? मोदींना रोखण्यासाठी नवी रणनीती  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूSonia Gandhiसोनिया गांधीdelhiदिल्ली