शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

आंध्रप्रदेशात 4 दिवसात झाली 200 कोटींची मद्यविक्री

By admin | Published: July 06, 2017 4:34 PM

आंध्रप्रदेशात चार दिवसामध्ये विक्रमी मद्यविक्री झाल्याची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 6- आंध्रप्रदेशात चार दिवसामध्ये विक्रमी मद्यविक्री झाल्याची नोंद झाली आहे. चार दिवसात आंध्रप्रदेशात 200 कोटींची दारू विकली गेली आहे. तेथिल 70 टक्के दारूची दुकानं परवान्यांचं नुतनीकरण न झाल्याने बंद असूनही इतकी दारू विकली गेली आहे. शहरांतून जाणारे रस्ते हे महामार्ग या व्याख्येतून वगळता येतील, असं सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर तेथिल दारूची दुकानं सुरू झाली होती. तसंच शहरामध्ये दारूची दूकानं बंद असावी या मागणीसाठी तेथिल महिलांनी आंदोलनही केलं होतं पण त्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम दारू विक्रीवर झाला नसल्याचं चित्र दिसतं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंगळवारी आंध्रप्रदेशातील दारूची दुकानं सुरू झाली. चार दिवसात झालेली दारू विक्री पाहून आम्हीही गोंधळलेलो आहे, अशी प्रतिक्रीया उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 200 कोटी रूपयांची दारू विक्री तेथे जास्त प्रमाणात असलेल्या दारूच्या अनधिकृत  दुकानांमुळे झाली आहे, असं उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांनी नमूद केलं. 
 
आणखी वाचा
 

शहरांतील महामार्गांवर दारू मिळणार? सुप्रिम कोर्टानेच दाखवला "मार्ग’

भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड

4 जुलै रोजी एपी ब्रेवेरीज कॉर्पोरेशन या कंपनीने 58.82 कोटी रूपयांचा माल बाजारात आणला होता. तसंच अनधिकृत दारूची दुकानं असल्याने जास्त विक्री झाली. याचा अर्थ सरकारकडून दारूविक्रीला प्रोत्साहन दिलं जातं आहे, असं एआयडीडब्लुएचे स्टेट जनरल सेक्रेटरी डी रामदेवी यांनी तक्रारीत म्हंटलं आहे. 

अधिकृत रेकॉर्डनुसार उत्पादन शुल्क विभागाने हायवेवरील दूकानं बंद असल्याचं गृहीत धरून जून महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात मद्य पुरवठा केला नव्हता. तसंच परवानाधारक दारू विक्रेत्यांना  त्यांच्याकडील माल संपवून 1 जुलैपर्यत नवीन परवाना मिळविण्यासाठी तसंच पर्यायी स्थळांसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 1 जुलैपासून राज्यातील 10 ते 15 टक्के दुकानं नवे परवाने मिळाल्यानंतर सुरू झाली. या दुकानदारांनी पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी 18 कोटींचा स्टॉक विकत घेतला. 2 जुलै रोजी 56.97 कोटी तर 3 जुलै रोजी एकूण 75.01 कोटींचा स्टॉक विकत घेतला होता.