शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 08:32 IST

AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे.

Telangana-Andhra Pradesh Flood : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित आणि वित्तहानी, तसेच मोठ्या प्रमाणावर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाध साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय, स्थानिक परिस्थितीनुसार 2 सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रेल्वेचा विचा करता, दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच चार गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर 54 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

नरेंद्र मोदींनी घेतला पूर स्थितीचा आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, या दोन्ही राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तेलंगानामध्ये 9 जणांचा मृत्यू तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. रविवारी हैदराबादसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नाले भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे गावा गावांतील रस्त्यांद्वारे होणारा संपर्क विस्कळीत झाला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.

टॅग्स :floodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू