शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:53 IST

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले.

ठळक मुद्देचीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता. त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याची आठवण करुन दिली.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखाच सोशल मीडियावरुन मांडला आहे. मोदी सरकाने किती पारदर्शी आणि विकासात्मक काम केल्याचं भाजपाने म्हटले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही मोदींच्या 7 वर्षीय वाटचालीतील विकासाची घोडदौड सोशल मीडियातून सांगितली आहे. तसेच, न्यूज वृत्त वाहिन्यांमध्येही डिबेट शो सुरू होते. एका डिबेट शोमध्ये संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. 

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. मोदी सरकार चीनचं नाव घ्यायलाही घाबरते, पण इंदिरा गांधींनी जगाचा नकाशा बदलून पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचं सुप्रिया यांनी म्हटलं. सुप्रिया यांच्या या वक्तव्यानंतर संबित पात्रा चांगलेच संतापले अन् दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक संघर्ष सुरू झाला. 

चीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता. त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याची आठवण करुन दिली. त्यावेळी, किती रुपयाची घेवाण-देवाण झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वाद सुरू होता. त्यावेळी, सुप्रिया यांनी संबित पात्रा यांना जोकरपंती करतात, असे संबोधले. त्यामुळे, राहुल गांधींचं नाव का घेता, राहुल गांधींना हटवा, असे संबित पात्रा यांनी म्हटले. त्यावर, श्रीनेत चांगल्याच संतापल्या व त्यांनी संबित पात्रा यांना गटारातला किडा म्हणत त्यांच्यावर टीका केली.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्रा