शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

लग्नमंडप अक्षदा पडण्यापूर्वीच सोडण्याची दुर्दैवी वेळ हृदयद्रावक : मेहुण्यांचा मृत्यू झाल्याने घरातच झाला अनिल पवारचा विवाह

By admin | Published: March 29, 2016 12:25 AM

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.
ममुराबाद रस्त्यावरील पवननगरात राहणारा अनिल रमेश पवार याचा विवाह सुरत येथील रहिवासी अशोक कदम यांच्या मुलीशी ठरलेला होता. २७ मार्चला सायंकाळी हळद समारंभ होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे मंडळीची जेवणाची पंगत बसलेली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक लग्न मंडपाच्या काही लोखंडी पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अनिलचे चुलत मेहुणे जितेंद्र बळीराम मराठे (वय ३२, रा.थाळनेर, ता.शिरपूर) हे हात धुण्यासाठी मंडपाच्या बाहेर जात होते. त्याच वेळी पाईपला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या प्रकाराने मंडपात गोंधळ उडाला. पळापळीत रेखा संतोष जगताप (वय ४०, रा.तळवेल), ज्योती संजय चौधरी (वय २५, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) व भरत ओंकार पवार (वय ६०, रा.पवननगर, जळगाव) यांनाही विजेचा धक्का बसला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत वीज प्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर जखमींना नागरिकांनी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी जितेंद्र मराठे यांना मृत घोषित केल्याने एकच शोककळा पसरली.
घरात झाला विवाह
लग्नासाठी दोन्ही पक्षाकडील वर्‍हाडी मंडळी बाहेरगावाहून जळगावला येण्यासाठी निघालेली होती. वधू पक्षाकडील वर्‍हाडीदेखील सुरतहून रविवारी सायंकाळीच निघालेले होते. त्यानंतर रात्रीच्या ११ वाजता अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांना रस्त्यातूनच परत पाठवणे शक्य नव्हते. तसेच वधू-वरांना हळद लावण्यात आली होती. म्हणून विवाह पुढे ढकलणे अशक्य होते. म्हणून दोन्ही पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी पुढे येऊन विवाह तिथीनुसार मात्र, घरातच साध्या पद्धतीने लावण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी सकाळी हा विवाह झाला.