शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

असंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 20:04 IST

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई - बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रांझ पदकविजेता बॉक्सर आणि देशातील नामवंत खेळाडू असलेल्या विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अन्ना हजारेंना चिमटा काढला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत, असंच, पण आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, असे ट्विट विजेंदर सिंगने केले आहे. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांला विरोध करत पंजाबमधील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली होती. 

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक अध्यादेशासह पुतळ्याचे दहन  करून संताप व्यक्त केला.अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात या भागातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची धग पाहायला मिळाली. येथील शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्याही अडवल्या होत्या. 

मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्याच हिताचे जास्त असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी या विधेयकाला विरोध करत आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणाचा रहिवासी असलेल्या आणि माजी ऑलिंपिकविजेता बॉक्सरने भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी मोठं आंदोलन उभारणाऱ्या अन्ना हजारेंची आठवण काढली आहे. असंच, आज अन्ना हजारेंची आठवण आली, असे विजेंदरने म्हटलंय.  

आय सपोर्ट भारत बंद, या हॅशटॅगने विजेंदर सिंगने ट्विटरवर पोस्ट केली आहे. विजेंदरची ही पोस्ट रिट्विट करत माजी केंद्रीय कायदामंत्री डॉ. अश्वानी कुमार यांनी त्याचं कौतुक केलंय. तसेच, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. याबद्दलही विजेंदरने त्यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, अन्ना हजारे यांनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठे आंदोलन उभारले होते. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अन्नांनी उभारलेल्या या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे. या आंदोलनातूनच दिल्लीत सत्ताक्रांती झाल्याचेही देशाने पाहिले आहे. त्यामुळे, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्ना गप्प का? असा प्रश्न विजेंदरसह अनेकांना पडलाय. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेVijender Singhविजेंदर सिंगFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंद