शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
2
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
3
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
4
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
6
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
7
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
8
Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."
9
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
10
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
11
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
12
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
13
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
14
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
15
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
16
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
17
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
18
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
19
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
20
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 9:06 AM

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या घोषणेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय लाभ मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप प्रबळ नाही तिथे भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेमुळे मतदारांचे लक्ष या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्या राज्यात भाजपला मतदारांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही. तसेच तेलंगणातही राजकीय फायदा होणार आहे. चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून मोदी सरकारने राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरींचे मन जिंकले आहे. ते चौधरी चरणसिंहांचे नातू आहेत. जाट आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा जयंत चौधरींना आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिल्यामुळे तामिळनाडू व दक्षिण भारतातील अन्य राज्यांत भाजपला आणखी अधिक शिरकाव करता येईल, असा त्या पक्षाचा विचार असल्याचे कळते.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह

शेतकरी कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पितमाजी पंतप्रधान चाैधरी चरणसिंह हे शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जातात. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले हाेते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात याेगदान हाेते. १९२९मध्ये त्यांना इंग्रजांनी तुरुंगातही टाकले हाेते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलांवर पाऊल ठेवले. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव

राजकीय ‘विद्वान’ : आर्थिक उदारीकरणाचे जनक सलग आठ वेळा लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि काॅंग्रेस पक्षात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांना १७ भाषा अवगत हाेत्या. ६० वर्षांच्या वयातही त्यांनी संगणक प्राेग्रॅमिंगच्या २ भाषा शिकल्या हाेत्या. नरसिंह राव यांचे महाराष्ट्राशी घनिष्ट संबंध हाेते.

कृषितज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन

देशाच्या कृषिक्रांतीचे जनक; संशाेधनासाठी वाहिले आयुष्यस्वातंत्र्यानंतर देशामध्ये अन्नधान्याची टंचाई असतना डाॅ. स्वामिनाथन यांनी महत्त्वपूर्ण संशाेधन करुन कृषिक्रांती घडविली. त्यांनी जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित केले हाेते. याशिवाय तांदुळवरही त्यांनी संशाेधन केले. बंगालच्या दुष्काळामुळे व्यथित झालेले स्वामीनाथन यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशाेधनासाठी वाहिले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBharat Ratnaभारतरत्नFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश