शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2016 3:39 PM

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. केरळ, पुडूचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्पे आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. या सर्व राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. 
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे तर ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  या निवडणुकांसाठी ७५ ते ८० हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात येणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार आहे.पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे
 
पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम 
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार.
 
पुडूचेरीमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार
 
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार.
 
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १६ मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहिल्या टप्प्याचे मतदान दोन तारखांना होणार, चार एप्रिल आणि ११ एप्रिल.
 
पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्याचे, २१ एप्रिलला तिस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये २५ एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि ३० एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये ५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार.
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल.
 
प्रत्येक राज्यामध्ये पाच केंद्रीय निरीक्षक निवडणूकीवर लक्ष ठेवतील.
 
मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार.
 
आसाममध्ये १.९८ कोटी मतदार, केरळमध्ये २.५६ कोटी मतदार, तामिऴनाडूत ५.८ कोटी मतदार, पश्चिम बंगालमध्ये ६.५५ कोटी मतदार आणि पुडूचेरीत ९.२७ लाख मतदार.
 
मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये आदर्श अचारसंहिता लागू.
 
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार - मुख्य निवडणूक आयुक्त.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार.