शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आणखी ४0 स्मार्ट सिटिज २३ जूनला

By admin | Published: June 15, 2017 12:59 AM

स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट शहरांची संख्या १00 वर पोहोचणार आहे. नगर विकास मंत्रालयाने २३ जूनला सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एका विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, त्यावेळी त्यांची नावे जाहीर करण्यात येतील.या कार्यशाळेत शहरांच्या लाईव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्ससह नगरविकास मंत्रालयाच्या आजवरच्या खास उपक्रमांची माहिती सादर केली जाईल, ही माहिती नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी पत्रकारांना दिली. भारतात ज्या शहरांमध्ये नगरपालिका आहेत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी के्रडिट रेटिंग मिळवले तर कर्ज मिळवण्यासाठी त्यांना दहा ठिकाणी हिंडावे लागणार नाही, असे स्पष्ट करून नायडू म्हणाले की, देशात स्मार्ट सिटीज व अमृत योजनेतील ३२२ शहरांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्रेडिट रेटिंग आजवर मिळवले आहे. हा एक चांगला पायंडा आहे. देशातील सर्वच शहरांच्या नगरपालिका लवकरच क्रेडिट रेटिंग मिळवतील, अशी आशा आहे. प्रत्येक शहराचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, ही संकल्पना नवी नाही, हे मान्य करीत नायडू म्हणाले की, आजवर विविध प्रकल्पांसाठी कर्ज, अनुदान, अर्थसाह्य इत्यादी स्वरूपात मदत मागण्यासाठी राज्य सरकारांचे प्रतिनिधी केंद्राकडे यायचे. राज्यांच्या प्रकल्पांसाठी केंद्राच्या विविध मंजुऱ्या मिळवाव्या लागत. त्यासाठीही राज्याचे प्रतिनिधी वारंवार दिल्लीला चकरा मारायचे. मोदी सरकारने हा पॅटर्न पूर्णत: बदलून टाकला. आता केंद्र सरकारचे अधिकारी राज्यांत जातात. प्रकल्प व योजनांची समिक्षा करतात आणि गरज भासल्यास त्यात आवश्यक ते बदल स्ुचवून या प्रकल्पांना अथवा योजनांना त्या राज्यातच मंजुरी दिली जाते. गेल्या तीन वर्षांत २२ राज्यांमध्ये प्रकल्प मंजुरी बैठका झाल्या आहेत. पहिल्या दिवशी केंद्राचे अधिकारी प्रकल्प वा योजनेची चिकि त्सा करतात आणि दुसऱ्या दिवशी सुचवलेल्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री मंजुरी देतात. या प्रयोगामुळे देशात अनेक विकास प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळाली आहे, असा दावाही नायडू यांनी केला.४ लाख कोटींच्या गुंतवणुकीला मान्यताभारतात २0५0 पर्यंत शहरांची लोकसंख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक होणार आहे. देशापुढील हे मोठे आव्हान आहे, हे लक्षात घेऊ न मोदी सरकारने नगरविकासाशी संबंधित विविध योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने आतापर्यंत नगरविकास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.