शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:56 IST

या वर्षी आतापर्यंत 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्याचा प्रण घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तर, या कारवाईला घाबरुन अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणदेखील करत आहेत. याच क्रमाने छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात गुरुवारी 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 9 जणांवर 24 लाख रुपयांचे बक्षीस होते. 

पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे. विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव म्हणाले की, या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांची पोकळ आणि अमानवी विचारसरणी, वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून निष्पाप आदिवासींचे होणारे शोषण आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावाबद्दल निराशा व्यक्त केली.

'निया नेल्लानार' (तुमचे चांगले गाव) योजनेवर नक्षलवाद्यांचाही प्रभाव आहे, ज्या अंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासन मूलभूत सुविधा पुरविण्याचा आणि अंतर्गत भागात विकास कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या गांगलूर एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्षलवाद्यांवर लाखोंचे बक्षीसमाओवादी विभागीय समितीचा सदस्य दिनेश मोदियम (36) हा विजापूर जिल्ह्यातील 26 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता आणि त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याची पत्नी ज्योती टाटी उर्फ ​​काला मोडियम (32) आणि दुला करम (32), दोघेही क्षेत्र समिती सदस्य म्हणून सक्रिय होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्या इतर सहा जणांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस होते.

यावर्षी 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण यादव पुढे म्हणाले की, या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि त्याची एलिट युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी आतापर्यंत राज्यातील बस्तर रेंजमधील विजापूर जिल्ह्यात 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर भागात 792 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडAmit Shahअमित शाह