शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

सर्पदंशावरील औषधाला अंनिसचा विरोध

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM

राजेवाडी येथील प्र्रकार : राज्यभरातून आलेले नागरिक परतले रिकाम्या हाताने

राजेवाडी येथील प्र्रकार : राज्यभरातून आलेले नागरिक परतले रिकाम्या हाताने
डिंभे : राजेवाडी (ता. आंबेगाव) येथे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अमावस्येला दिल्या जाणार्‍या सर्पदंशावरील आयुर्वेदिक औषध वाटपावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने सर्पदंशावर मिळणार्‍या औषधाचे वाटप बंद करण्यात आले. घोडेगाव पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीमुळे यंदा औषधाचे वाटप बंद केल्याने जिल्‘ासह बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक येथून आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या औषधाच्या जोरावर आम्ही वर्षभर शेतीवाडीत, काट्याकुट्यात काम करताना निश्चिंत राहायचो, अशा प्रतिक्रिया येथे दूरदूरवरून आलेल्या लोकांकडून बोलून दाखविल्या.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील राजेवाडी गावरचे सखाराम उंडे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अमावस्येच्या दिवशी जंगलातील एका विशिष्ट वनस्पतीपासून सर्पदंशावरील औषध तयार करतात. हे औषध घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने राज्यभरातून नागरिक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील दत्तमंदिरात यायचे. हे आयुर्वेदिक औषध घेतल्यास वर्षभरात सर्पदंश झाल्यास रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या अंगात प्रतिकारशक्ती तयार होते व त्या रुग्णाचे प्राण वाचते, असा समज असल्याने आजही जिल्‘ातील जुन्नर, आंबेगाव, खेड, तर बीड, उस्मानाबाद, नाशिक, फलटण, इगतपुरी, दौंड, संगमनेर, वडगाव मावळ, तळेगाव आदी ठिकाणांहून लोक हे औषध घेण्यासाठी आले होते. शेतकरीवर्ग, नोकरदार, मजूर, डॉक्टरही हे औषध घेण्यासाठी येत असल्याचे पाहावयास मिळत होते.
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्यासाठी सन २०१३ रोजी झालेल्या कायद्यानुसार अशा प्रकारची औषधे देणे हा गुन्हा आहे. या कृत्यास पायबंद घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे औषध देण्याविषयी आक्षेप घेतला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्रीकांत तिडके यांनी याविषयी घोडेगाव पोलीस ठाण्याला तक्रार अर्ज दाखल केल्याने यावर्षी राजेवाडी येथे दिले जाणारे सर्पदंशावरील औषधाचे वाटप बंद करण्यात आले. २ दिवसांपूर्वी सखाराम उंडे यांना घोडेगांव पोलिस स्टेशनला बोलावून या बाबत कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार आज राजेवाडी येथील औषधवाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोट :
जंगलातील झाडपाल्यापासून हे औषध तयार करून माझ्याकडे येणार्‍या लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे. पूर्वापार काळापासून जेथे दवाखान्यांची जवळपास सोयी-सुविधा नाहीत अशा ठिकाणी आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक असाध्य रोग आयुर्वेदिक औषधांपासून बरे झाले आहेत. या औषधासाठी मी कुणाकडून कोणत्याच प्रकारचा मोबदला घेत नाही. माझ्या गुरूकडून ही विद्या मला मिळाली आहे. पूर्वी परिसरातील ठराविक चार-दोन गावांतील लोकांनाच हे औषध मी देत असे. मात्र, अलिकडे हे औषध घेण्यासाठी अनेक लोक येऊ लागले. केवळ सामाजिक कार्याच्या भावनेतून आजपर्यंत मी हे औषध लोकांना देत आलो आहे. याबाबत राज्य शासनाने मला आदिवासी समाजसेवक हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सखाराम उंडे, वैद्य
---------
गेल्या ३-४ वर्षांपासून येथे औषध घेण्यासाठी येत आहे. मला नागीण झाली होती. ती या औषधामुळे बरी झाली. हे औषध खाल्ल्यास साप दिसला तरी तो जवळ येत नाही, असा माझा अनुभव आहे.
बबुशा नाथा घोगरे, जुन्नर

२) गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मी हे औषध घेण्यासाठी दरवर्षी येत आहे. साप जरी जवळ आला तरी तो चावा घेत नाही, असा माझा याविषयी अनुभव आहे.
बबन बुके, आडगाव सुपे (खेड)

३) मी सर्पदंशावरील पेशंट घेऊन येथे आलो होतो. सर्पदंश झाल्याने पेशंटला रक्ताच्या उलट्या होत होत्या. हे औषध खाल्ल्यानंतर पेशंटचा जीव वाचला.
चासकमान कान्हेवाडी (ता. खेड) येथून आलेले बाबूराव धोंडिबा निमसे.
---------------
२०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात झालेल्या कायद्यानुसार अंधश्रद्धेवर आधारित एखादी घटना किंवा कृती कोठेही घडत असल्यास त्याला निर्बंध घालण्याच्या सूचना आहेत. राजेवाडी येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वर्षभरात साप चावल्यास विष चढत नाही. माणूस मरत नाही, असे सांगून औषध दिले जाते आणि पैसे गोळा केले जातात, असा आरोप करीत हा प्रकार थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. असा कुठलाही प्रकार येथे करू नये, याबाबतची सूचना या कार्यक्रमाच्या आयोजकांना आम्ही दिल्या आहेत. तसेच असा प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव
-----------------
ओळी- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपामुळे राजेवाडी (ता. आंबेगाव) येथील सर्पदंशावरील औषधाचे वाटप बंद केल्याने लोकांना औषधाविना परतावे लागले.
(छायाचित्र : कांताराम भवारी)