शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत धक्का; भाजपा नेत्याला ईव्हीएमवर शंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 11:28 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा तिन्ही विधानसभा मतदारसंघात पराभव

कोलकाता: पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर आता भाजपानं ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. विधानसभेच्या तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारच्या यंत्रणेनं तृणमूल काँग्रेसला उघडपणे मदत केली. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंदेखील सिन्हा म्हणाले.निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जातं. मात्र पोटनिवडणुकीच्या कामावर राज्य सरकारच्या प्रशासनाचं लक्ष असतं. तृणमूल काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असं सिन्हा यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएमसोबत काहीही केलं जाऊ शकतं. ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. सत्ताधारी पक्षाकडून मतमोजणीवेळी घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. आपल्या दाव्याचं समर्थन करताना सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. 'लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं कालियागंज आणि खरगपूर विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. कालियागंज आणि करीमपूरमध्ये भाजपाला २०१६ च्या तुलनेत जास्त मतं मिळाली होती. मग आम्ही सर्व मतदारसंघात कसे काय पराभूत होऊ शकतो? तृणमूलनं पहिल्यांदाच खरगपूर मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यामुळे शंका घेण्यास वाव आहे,' असे सिन्हा म्हणाले. कालियागंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी निकटचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा २४१८ मतांनी पराभव केला. खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा २०,८११ मतांनी, तर करीमपूर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या बिमलेंदू सिन्हा रॉय यांनी भाजपच्या जयप्रकाश मजुमदार यांचा २३,६५० मतांनी पराभव केला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEVM Machineएव्हीएम मशीन