शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

काहीही होवो, नद्या जोड प्रकल्प राबवणारच -केंद्र

By admin | Published: January 14, 2015 12:31 AM

पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून अनेक वर्षांपासून रखडलेला नद्या जोड प्रकल्प पुढे रेटण्याचा मनोदय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे़

नवी दिल्ली : पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून अनेक वर्षांपासून रखडलेला नद्या जोड प्रकल्प पुढे रेटण्याचा मनोदय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे़ नद्या जोड प्रकल्प कुठल्याही स्थितीत राबवला जाईल आणि या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तोडगा शोधला जाईल़ प्रसंगी त्याला डावलून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असा ठाम निर्धार केंद्र सरकारने मंगळवारी बोलून दाखवला़गेल्या अनेक वर्षांपासून नद्या जोड प्रकल्प रखडलेला आहे़ नद्या जोडणीमुळे सागरी जीवन धोक्यात येईल़ जैवविविधता आणि परिसंस्थेलाही यामुळे धोका उद्भवेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे़ त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध चालवला आहे़ या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एम़ वेंकय्या नायडू यांनी ‘भारत जल सप्ताह’प्रसंगी बोलताना नद्या जोड प्रकल्पाच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली़ आमचे काही पर्यावरणवादी मित्र नद्या जोड प्रकल्पाबाबत चिंतित आहेत़ लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार आहे़ तो उठत असेल तर उठू द्या;मात्र त्याचे उत्तरही आहे़ आम्ही प्राधान्यक्रमाने नद्या जोड प्रकल्प राबवणार, मग काहीही होवो, असे नायडू यावेळी म्हणाले़ या प्रकल्पाच्या मार्गात कुठलीही बाधा येवो, तिच्यावर तोडगा काढला जाईल वा तिला मार्गातून हटविले जाईल़ विकसित देश आपल्याला ‘शिकवत’ आहेत़ आता आपल्यालाही विकसित व्हावे लागेल़, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जल सुरक्षेसाठी ठोस जल व्यवस्थापनेवर भर दिला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)