शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

तिकिटावरील सबसिडी सोडण्यासाठी रेल्वे करणार आवाहन

By admin | Published: July 06, 2017 6:36 PM

धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वयंपाक गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं होतं. आता त्याच धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे. मोदींच्या डिजिटल इंडिया या योजनेला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वे प्रशासन हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी डायनामिक फेअर पद्धत अवलंब केला जाणार आहे. राजधानी, शताब्दी या रेल्वे गाड्यांमध्ये आधीपासूनच डायनामिक फेअर पद्धत लागू करण्यात आली आहे.

आणखी वाचा(पश्चिम रेल्वेवरील प्रवास होणार सुसाट)(ऑनलाइन रेल्वे तिकीट महागण्याची शक्यता)ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकिटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित केली आहे. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो. 

यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एसी बोगीच्या तिकीटावरील सर्व्हिस टॅक्समध्ये आर्ध्या टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4.5 टक्के टॅक्स भरावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर हा टॅक्स 5 टक्के होईल. 
विशेष म्हणजे रेल्वे बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाइन रेल्वे तिकिटांवर सर्व्हिस टॅक्स रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्व्हिस टॅक्स कधीपर्यंत रद्द केला जाणार आहे यासंदर्भातील माहिती जेटलींनी दिली नव्हती. 
याआधी रेल्वे प्रवास सुरक्षेच्या कारणास्तव महाग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेली होती. रेल्वे प्रवाशांवर सेफ्टी सेस लावण्याचा विचार केला जातो आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे सेफ्टी फंडासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रवाशांना केलं होतं. पाच वर्षापूर्वी रेल्वे सेफ्टीसाठी एक लाख करोड देण्याचा निर्णय झाला होता.