शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मदरशांमध्ये मुलांना कट्टर बनवतात, शिरच्छेद करायला शिकवतात', आरिफ मोहम्मद खान यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:12 IST

Udaipur Murder: काल झालेल्या कन्हैया लालच्या हत्येमुळे देशात कट्टरतावाद्यांविरोधात संतापाचे वातावरण आहे. यावरुन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मदरशांच्या शिक्षणावर मोठे विधान केले आहे.

Udaipur Murder: मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. यातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे आरिफ मोहम्मद यांचे म्हणणे आहे. 

'मुलांना कट्टर बनवले जात आहे'आरिफ मोहम्मद म्हणाले, 'आमच्या मुलांना निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुस्लीम कायदा कुराणातून आलेला नाही, तो काही व्यक्तींनी लिहिला आहे. त्यात त्यांनी शिरच्छेदाचा कायदा लिहिला आणि हाच कायदा मदरशात मुलांना शिकवला जातोय.' 

अनेकदा ते कट्टरतेवर टीका करतातआरिफ मोहम्मद खान अनेकदा कट्टरतेवर टीका करताना दिसतात. ते म्हणतात की, मौलाना आणि मदरसे मुस्लिमांच्या एका वर्गाला कट्टरपंथी बनवत आहेत. ते गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवतात, यामुळेच बालपणात मुलांमध्ये इतर धर्मांबद्दल द्वेष निर्माण होतो. यामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर इतर धर्माच्या लोकांबद्दल सावध राहतात आणि नेहमी संशयाने भरलेले असतात. आरिफ मोहम्मद यांच्या या विचारांवर अनेकदा टीकाही होते.

कन्हैया लालवर 26 वारकाल राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली. दोन मुस्लिम तरुण त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि कन्हैयावर चाकूने वार केला. या रानटी हल्ल्यात कन्हैया लालचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मारेकर्‍याने कन्हैया लालवर 26 वार केल्याचे समोर आले आहे. रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस अशी आरोपींची नावे असून, त्यांना उदयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या राजसमंद येथून अटक करण्यात आली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस