शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"कलम 370 हटवलं, पण काश्मीरमध्ये कुणी साधा दगड उचलायची हिंमत केली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:46 IST

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सोनिया आणि मनमोहनसिंग यांचं सरकार काहीही उत्तर देत नव्हतं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील कार्यक्रमातून समान नागरी कायद्यावर भाष्य केलं. त्यानंतर, देशभरात समान नागरी कायद्यावरुन चर्चा सुरू आहे. त्यातच, देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीका करताना सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकची आठवण करुन दिली. अमित शहांनी आपल्या भाषणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. तर, काँग्रेसलाही लक्ष्य केले. काँग्रेस सरकारमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. मात्र, आता सर्जिकल व एअर स्ट्राईक होत आहेत, असे शहांनी म्हटलं. 

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सोनिया आणि मनमोहनसिंग यांचं सरकार काहीही उत्तर देत नव्हतं. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वात पुलवामा आणि उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला मोदींनी १० दिवसांतच सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईक करुन प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना मारलंय. काँग्रेस, जदयू, आरजेडी आणि ममता हे सर्वचजण कलम ३७० ला लेकराप्रमाणे आपल्या मांडीवर खेळवत होते. हे, म्हणत होते कलम ३७० हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. पण, राहुल बाबा, मोदींनी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहणे तर दूरच, पण साधा दगड उचलायचीही हिंमत कोणी केली नाही, असे म्हणत अमित शहांनी कलम ३७० हटवल्याचं सांगितलं. 

पक्षाच्या नावाने जे आपला वारसा चालवतात, आज त्यांना भीती आहे. मोदींनी वंशवादाला थारा न देत, विकासवादाला चालना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला कणखर बनवलंय. गाव, गरिब, श्रीमंत, महिला, वंचित, शोषित, दलित, युवक या सर्वांना ताकद देत देशाला मजबूत बनवलंय, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले.   

दरम्यान, सध्या देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येतंय. यासंदर्भात भोपाळ येथे भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून युसीसीचा उल्लेख केला. तसेच, मुस्लीम बांधवांना आवाहनही केलय, या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर मोदींनी टीकाही केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस