शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अरुणाचलमध्ये काँग्रेस संकटात - मुख्यमंत्र्यांसह ४३ आमदार नव्या पक्षात

By admin | Published: September 17, 2016 4:19 AM

मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये विलीन झाल्याची घोषणाही केली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली/इटानगर काँग्रेस पक्षाला शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमधील सरकार गमवावे लागले. नुकतेच मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये (पीपीए) विलीन झाल्याची घोषणाही केली. यामुळे अप्रत्यक्ष का असेना भारतीय जनता पार्टीची तेथे सत्ता असेल. काँग्रेस या राजकीय भूकंपाला तोंड देत आहे.काँग्रेसचे प्रभारी महासचिव सी. पी. जोशी यांना आपल्या पक्षात बंडखोरी होत असल्याची कुणकुणही लागली नाही. जेव्हा बंडखोरीची वार्ता पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यांत जोशी जेथे कुठे प्रभारी आहेत तेथे अंतर्गत असंतोषाने टोक गाठले आहे.

अरुणाचल प्रदेशात झालेल्या या बंडखोरीनंतर काँग्रेसने कशीबशी बाजू सावरताना मोदी सरकार आणि भाजपवर हल्ला केला. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणीही केली. पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला आणि जोशी यांनी असा युक्तिवाद केला की सगळेच आमदार हे काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते, लोकांनी काँग्रेसला मते दिली होती म्हणून आता नव्याने निवडणूक घ्यायला हवीच. लोकांनी काँग्रेसला कौल दिला होता पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशला नाही. काँग्रेसने नबाम तुकी यांना दूर करून पेमा खांडू यांना मुख्यमंत्री बनविले होते. आज तेच तुकी काँग्रेससोबत असून इतर सगळे आमदार पेमा खांडू यांच्यासोबत पीपीएच्या तंबूत दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. पहिले बंड २०१५मध्ये झाले होते. तेव्हा कालिको पुल २४ आमदारांसोबत स्थानिक पक्ष पीपीएमध्ये दाखल झाले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथे काँग्रेसला सरकार तर पुन्हा मिळाले; परंतु बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री नबाम तुकी यांना पदावरून दूर करावे लागले. बंडखोरांच्या दडपणामुळे दोरजी यांचे चिरंजीव पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागले. काँग्रेसचा भाजपावर आरोप... या बंडखोरीला काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनाच जबाबदार धरले आहे. मोदी देशाच्या संघरचनेला खिळखिळे करीत आहेत. योजना आयोगाला बंद पाडून निति आयोगाच्या नावावर राज्यांना केंद्राकडून दिला जाणारा निधी राजकीय कारणांसाठी खर्च होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये याच पैशांच्या आधारे काँग्रेसमध्ये बंडखोरी घडवून आणली व तो कट मोदी आणि शाह यांनी रचला होता, असा काँग्रेसचा आरोप आहे.